लातूर – जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही; मात्र मुंबई-पुणे येथून येणार्या नागरिकांनी गावात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देणे आवश्यक असूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज असली, तरी सर्वसामान्य नागरिकांनी ही माहिती देणे अनिवार्य आहे. या नोंदींसाठी ‘आशा वर्कर्स’ काम करत आहेत. त्यानुसार १८ सहस्र लोकांची नोंदणी झाली आहे. यातील ५५ नागरिक संशयित आहेत, त्यातील ३२ जणांचे नमुने पडताळणीसाठी पाठवण्यात आले असून त्यातील सर्वांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आहेत. शहरातील नागरिक ग्रामीण भागात आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अशा नागरिकांनी पडताळणी करून गावात प्रवेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; मात्र प्रत्यक्षात त्याची कार्यवाही केली जात नाही. गावाकडे परतलेल्या नागरिकांच्या पडताळणीसाठी एका वैद्यकीय अधिकार्याची नेमणूक केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > मुंबई-पुणे येथून १८ सहस्र नागरिक लातूर येथील गावांमध्ये परतले
मुंबई-पुणे येथून १८ सहस्र नागरिक लातूर येथील गावांमध्ये परतले
नूतन लेख
पावसामुळे १०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकांमध्ये पालट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील काही महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर विनामूल्य मिळणार !
पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार !
संपूर्ण जगाला तारणार्या हिंदु धर्माचे रक्षण होणे आवश्यक ! – प्रा. विनायक (श्याम) देशपांडे, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती, वर्धा
महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’ !
भारत पुन्हा विश्वगुरु झाला पाहिजे ! – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला