समाजाच्या अनुषंगाने व्यक्तीचे चारित्र्य महत्त्वाचे !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

सामाजिक संदर्भात व्यक्तीच्या चारित्र्याकडे पाहिलेच पाहिजे. ज्या व्यक्तीचे आचरण अगदी उघडपणे दुवर्तनात मोडणारे असेल, ती व्यक्ती समाजापुढे विशेषत: तरुणांपुढे तरी गौरवासाठी येताच कामा नये. वाङ्मयाला भूषण असणार्‍या त्याच्या पुस्तकाचे कौतुक करा. पुस्तकाला पाहिजे, तर हार घाला; परंतु माणसाला पुढे आणून त्याला समाजाच्या गौरवाचा विषय करू नका. पंडित राजेश्वरशास्त्री द्रविड यांच्यासारखी सच्चरित्र आणि अत्यंत विद्वत्ता संपन्न, सर्वशास्त्रपारंगत अशी व्यक्ती दिवंगत झाली, ती वार्ता चांगल्या प्रतिष्ठित आणि संस्कृतप्रेमी वृत्तपत्रांमध्येही ४-५ ओळीत कुठेतरी आली. त्यांच्या चारित्र्याचे आणि विद्वत्तेचे गुणगान करणारे लेख कुठेही आले नाहीत. उलट एखादा अभिनेता, अभिनेत्री मेले, तर त्यांच्या वर्णनाने वृत्तपत्राची पानेच्या पाने भरून लिहिलेली असतात.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती