महान कार्य करण्यासाठी आवश्यक सूत्रे !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘देशभक्तीवर माझा विश्वास आहे. तिच्यासंबंधी माझाही एक आदर्श आहे. महान कार्य करावयाचे असेल, तर त्यासाठी ३ गोष्टी आवश्यक असतात.

१. प्रथमत: कार्याची तळमळ हृदयापासून हवी.

२. बुद्धी किंवा तर्क यांत काय आहे ? तर्क आपल्याला किंचित् पुढे घेऊन जातो आणि नंतर त्याची गती कुंठीत होते; परंतु हृदयातूनच स्फूर्ती मिळते.

३. प्रेम हे अशक्य गोष्टींना शक्य करते. जगातील सर्व रहस्ये प्रेमाने उलगडतात.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)