गुरु-शिष्य नाते असे अनमोल । कोण करील त्याचे मोल ? ।।

सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेला भावपूर्ण वंदन करतांना शिष्य प.पू. डॉ. जयंत आठवले

हे गुरुदेवा, तुम्हीच आम्हाला सदैव शिष्यभावात कसे रहायचे, ते शिकवा !


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या विविध वचनांमधून लक्षात येणारे भाव-भक्तीचे महत्त्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘आपण काही करतच नाही, ‘सर्वकाही देवच करवून घेतो’, या विचाराने क्रियमाण कर्म नष्ट होते.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

शिष्यभाव

सद्गुरु हेच शिष्याचे सर्वस्व असते. स्वतःची सेवा करतांना इतरांना त्रास होत नाही ना ? किंवा त्यांच्या सेवेत अडथळा येत नाही ना ?, याची काळजी शिष्य घेतो. शिष्याच्या कोणत्याही कृतीमुळे इतरांच्या मनात त्याच्याविषयी, गुरूंविषयी किंवा अन्य कुठलेही विकल्प नसतात. इतरांना त्याच्या साधकत्वाविषयी निश्चिती असते. गुरुकार्य व्यवस्थित करण्यासाठी आवश्यक असलेल्या नेतृत्वासाठी लागणारे विविध गुण शिष्यामध्ये असतात. त्याचे गुरुबंधूंच्या आध्यात्मिक उन्नतीकडे लक्ष असते. साधकांनी साधनेचे प्रयत्न वाढवून गुरूंचे ‘शिष्य’ होण्यासाठी त्यांच्यात पात्रता निर्माण करणे अपेक्षित असते !

(संदर्भ – सनातननिर्मित ग्रंथ ‘शिष्य’)