सिंधु जल वाटप करार भारताने रहित केल्याचे प्रकरण

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जर भारताच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानकडे येणार्या पाण्याचा नळ बंद केला, तर आम्ही ते कधीही सहन करणार नाही. जर भारताने पाणी रोखले आणि जगाने यात मध्यस्थी केली नाही, तर कदाचित् हे पाण्यावरून होणारे जगातील पहिले अणूयुद्ध असेल. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज शेजारी आहेत. आपण एकमेकांच्या इतके जवळ आहोत की, एकदा का क्षेपणास्त्र डागले गेले, तर आपल्याकडे विचार करण्यासाठीही वेळ उरणार नाही. परिस्थिती अणूयुद्धापर्यंत पोचू शकते आणि असे झाल्यास पाकिस्तान याचे चोख उत्तर देईल, अशी धमकी पाकिस्तानचे माजी संरक्षण आणि परराष्ट्र मंत्री खुर्रम दस्तगीर खान यांनी सिंधु जल वाटप करार भारताने रहित केल्यावरून एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलतांना दिली.
क्षेपणास्त्रांना अफगाणी दरोडेखोरांची नावे दिल्यावरून पाकला पडला पेच !
Buddhist Monks Killed : थायलंड : ११ वर्षीय मुलाचा ट्रकवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात ९ बौद्ध भिक्षूंचा मृत्यू
खामेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आक्रमण केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील ! – Iran
Rajasthan ATS Raid : राजस्थानमध्ये पाकिस्तानी आतंकवाद्याशी संबंध असणार्या २८ संशयितांना अटक
पाक सैन्याने काश्मिरींना शस्त्रे दिली ! – POK Leader
Bangladeshi Infiltrators Arrest : बंगालमध्ये ९ बांगलादेशी घुसखोरांना अटक !