
नवी देहली –कराची शहरातील सिंध रेंजर्स या अर्धसैनिक दलाच्या मुख्यालयावर झालेल्या आतंकवादी आक्रमणामागे भारताचा हात असल्याचा पाकने केलेला आरोप भारताने फेटाळून लावला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पाकिस्तानचे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले. तसेच ‘पाकिस्तानने देशाचे धोरण म्हणून आतंकवादाचा वापर करण्याची प्रवृत्ती सोडून द्यावी’, असेही सांगितले. या आक्रमणात ३ आतंकवादी आणि ३ सैनिक यांचा मृत्यू झाला होता. आक्रमण करणारे आतंकवादी ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या संघटेनेचे होते.
Our response to media queries regarding allegations made by Pakistan ⬇️https://t.co/08biu984kA pic.twitter.com/eJ88YvCQvH
— Randhir Jaiswal (@MEAIndia) June 28, 2026
पाकिस्तानकडून अफगाणिस्तानावर आक्रमण : ३५ नागरिक ठार झाल्याचा दावा
कराचीतील आतंकवादी आक्रमणानंतर पाकिस्तानने २८ जूनच्या मध्यरात्री अफगाणिस्तानातील काही भागांवर हवाई आक्रमणे केली. (पाकिस्तान त्याच्या देशात आतंकवादी आक्रमण करणार्या अफगाणिस्तानमधील आतंकवाद्यांच्या तळावर आक्रमण करतो, तसेच जर भारत पाकमध्ये आतंकवाद्यांच्या तळावर आक्रमण करत असेल, तर पाक थयथयाट का करतो ? – संपादक) पाकिस्तानने ही आक्रमणे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि जमात-उल-अहरार या आतंकवादी संघटनांच्या तळांवर केल्याचे म्हटले असले, तरी अफगाणिस्तानकडून या कारवाईत मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पक्तिका आणि कुनार प्रांतातील निवासी भागांवर झालेल्या या आक्रमणात किमान ३५ नागरिकांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. पाकिस्तान सरकारने या कारवाईत २५ आतंकवादी ठार झाल्याचा दावा केला आहे.
Pakistan Gurdwara : पाकिस्तानात १२५ वर्षे जुने गुरुद्वारा भुईसपाट करण्याचा प्रयत्न
चीनच्या सैन्यासमवेत प्रतिवर्षी १ सहस्र १०० वेळा होतो सामना ! – General Upendra Dwivedi
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमधून आतंकवाद्याला अटक
FATF Grey List : पाकिस्तानला पुन्हा ‘एफ्एटीएफ्’च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्याची भारताची सिद्धता
अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याची घुसखोरी झालेली नाही ! – भारतीय सैन्याचे स्पष्टीकरण
(म्हणे) ‘जे पाणी अडवतील, त्यांचे हात तोडू !’ – Pakistani Minister Musadik Malik