
हावेरी (कर्नाटक) – येथील हानगल तालुक्यातील नरेगल गावात कार पौर्णिमेचा (वट पौर्णिमेचा) सण साजरा करत असतांना क्षुल्लक कारणावरून धर्मांध मुसलमानांनी एका शेतकर्याचा हात तोडला.
१. कार पौर्णिमेच्या उत्सवाच्या वेळी बैलंची शर्यत आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात तरुण आणि शेतकरी उत्साहाने सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बैल पळवत असतांना वाटेत एक मशीद लागली. या वेळी मशिदीजवळ काही जणांनी फटाके फोडले, असे सांगण्यात येत आहे.
२. यावर धर्मांध मुसलमानांया एका गटाने हिंदु शेतकरी आणि तरुण यांच्याशी भांडण चालू केले. या वेळी धर्मांधांच्या गटाने धारदार शस्त्रांद्वारे हिंदूंवर आक्रमण केले. या घटनेत शिवराज कुरुबर, नागप्पा कुरुबर, मल्लप्पा रायप्पा, लिंगराज महांतेश, जयप्पा संगप्पा, लोहित रेवणप्पा इत्यादी गंभीररित्या घायाळ झाले. या प्राणघातक आक्रमणाच्या वेळी धर्मांधांनी एका हिंदु शेतकर्याचा हातच तोडून टाकला.
३. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयी माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
४. पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा नोंदवून पुढील अन्वेषण चालू केले आहे.

बालकांचा गुन्हेगारीसाठी वापर करणार्या टोळ्यांविरुद्ध ‘मकोका’ कायद्यांतर्गत कारवाई करणार ! – मुख्यमंत्री
चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठ परिसराच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र रचले जात असल्याचा दावा !
केंद्रशासनाकडून ‘धर्मस्वातंत्र्य’ विधेयकास संमत्ती मिळाल्यावर धर्मांतराच्या घटनांत त्या अंतर्गत कारवाई होणार ! -मुख्यमंत्री
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
मुंबईत ६ हॉटेलसह बेकरी आणि क्लब यांचे परवाने निलंबित : १९ जणांना अटक !
आश्वासनांची पूर्तता गतीने होण्यासाठी महाराष्ट्र विधीमंडळ करणार ‘सॉफ्टवेअर’ची निर्मिती !