
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात रामभक्तांवर गोळ्या झाडल्या गेल्या होत्या, तर आज अयोध्येचे स्वरूप त्रेतायुगाची आठवण करून देते. आता मथुरा, वृंदावन आणि श्रीकृष्णजन्मभूमी यांविषयीही उघडपणे चर्चा झाली पाहिजे, असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे एका कार्याक्रमात केले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात सरकारी पैसा कब्रस्तान बनवण्यासाठी खर्च केला जायचा, तर आता तोच पैसा मंदिरे आणि विकासकामे यांसाठी खर्च केला जात आहे. मुरादाबादची ओळख आता दंगलींमुळे नाही, तर पितळ उद्योग आणि शेतकर्यांचे कष्ट यांमुळे आहे. राज्यामध्ये आता बाबर राज किंवा बाबरी विचारसरणी चालणार नाही, हे जनतेने सिद्ध करून दाखवले आहे.
New Army Chief : जनरल धीरज सेठ बनले भारताचे नवीन सैन्यदलप्रमुख
(म्हणे) ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासामध्ये एखादा मुसलमान असता, तर चोरीवरून त्याचे ‘एन्काऊंटर’ झाले असते !’ – Asaduddin Owaisi
देशभरात चांगला पाऊस पडण्यासाठी श्रीराम यज्ञ !
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !
PM Modi Appeals No POP : मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा !
गेल्या २४ घंट्यांत विविध राज्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ९ घटना !