सेवेचे महत्त्व सांगणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे २५ वर्षांपूर्वीचे बोल

‘वर्ष १९९९ मध्ये दोनापावला, पणजी येथील सनातनच्या सेवाकेंद्रात घडलेला एक प्रसंग साधनेतील ‘सेवा’ या टप्प्याचे अनमोल महत्त्व अधोरेखित करतो. (६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक दांपत्य कै. प्रभाकर वेरेकर आणि कै. (डॉ.) सौ. मंगला वेरेकर यांच्या दोनापावला, पणजी, गोवा येथील निवासस्थानी काही काळ सनातन संस्थेचे कार्य चालू होते.)
वर्ष १९९९ मध्ये एकदा दोनापावला येथील सेवाकेंद्रात काही साधक सेवा करणे, तसेच दायित्व घेणे, यांविषयी बोलत होते. काही वेळाने त्या ठिकाणी परात्पर गुरु डॉक्टर आले. ते साधकांना अत्यंत मोलाचे वाक्य बोलले, ‘‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही.’’ त्या वेळी काही जणांना गुरुदेवांचे हे बोल अविश्वसनीय वाटले असतील; पण आता जेव्हा मागे वळून पहातो, तेव्हा ‘२५ वर्षांपूर्वी गुरुदेवांनी ‘साधकसंख्या वाढेल’, असे केलेले भाकीत आज १०० टक्के सत्य ठरले आहे’, हे लक्षात येते. आज सनातनच्या माध्यमातून सहस्रो साधक साधनारत आहेत.

गुरुदेवांचे वरील वाक्य ‘आध्यात्मिक प्रगतीसाठी सेवा किती मूल्यवान आहे’, याची जाणीव करून देणारे आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव द्रष्टे असल्याने त्यांनी सहजतेने काढलेले उद्गारसुद्धा भाकितच ठरतात. त्यामुळे ‘काळानुसार गुरु जे मार्गदर्शन करत असतात, त्याचे आज्ञापालन करणे किती महत्त्वाचे आहे’, हे यातून लक्षात येते.
साधकांची संख्या वाढल्यावर अनेक प्रकारच्या सेवा करण्याची संधी मिळणे दुर्मिळ होत जाते. त्यामुळे मिळालेली प्रत्येक सेवा साधकांनी तळमळीने आणि भावपूर्ण अन् परिपूर्ण रितीने करायला हवी.
साधकांनो, ‘परिपूर्ण सेवा करणे’ ही श्री गुरूंचे मन जिंकण्याची गुरुकिल्ली असल्याने प्रत्येक सेवेला आपल्या उन्नतीचे साधन बनवा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (२१.६.२०२६)
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !
उत्साही आणि सेवेची तळमळ असलेले चि. संदीप गवंडी अन् इतरांना साहाय्य करणार्या आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या चि.सौ.कां. भाग्यश्री हडकर !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्यासाठी नवीन प्रश्न विचारण्याची कारणे आणि त्यांचे होणारे लाभ
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !