
१. ध्यानामुळे शरिरातील ‘कोर्टिसोल’ या ‘स्ट्रेस हार्मोन्स’ची (मानवी शरिरातील तणाव निर्माण करणारे संप्रेरक) पातळी न्यून होते, ज्यामुळे चिंता, नैराश्य आणि चिडचिड दूर होण्यास साहाय्य होते.

२. स्मरणशक्ती, ‘मूड’ (मन:स्थिती), झोप, भूक या गोष्टी नीट ठेवणार्या ‘एन्डोकॅनाबिनोईड सिस्टम’वर थेट परिणाम करून वरील गोष्टी सुधारायला साहाय्य करते.
३. एकाग्रता आणि स्मरणशक्ती यांमध्ये वाढ होते.
४. मोठ्या माणसांमध्ये रक्तदाब नियंत्रित रहायला साहाय्य होते. हृदयाचे स्वास्थ्य सुधारते. शरिराचा विदाह न्यून होऊन रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता सुधारते.
५. सध्याच्या काळात आवश्यकतेची आणि शिकवायला लागणारी गोष्ट म्हणजे भावनांवर सुनियंत्रण. ध्यानाने ही क्षमता वाढते.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.

हठयोग
अनेक शास्त्रे सांगणारी भारतीय संस्कृती !
मंत्रांसह सूर्यनमस्कार शिकून अनुभवा स्वास्थ्य आणि शक्ती !
योगाभ्यासाला विश्वविख्यात करण्यासाठी त्याला ‘निधर्मी’ करू नका !
कंबरदुखी, पचन, ताण, मधुमेह यांवर एकाच वेळी कार्य करणारे ‘बायोमेकॅनिकल’ भुजंगासन !