५ पर्यटक अद्यापही बेपत्ता

रत्नागिरी – तालुक्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले ५ तरुण समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने हे पाचही जण समुद्रात बुडाले असून सध्या ते बेपत्ता आहेत. २० जूनच्या सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. समुद्रात बेपत्ता असलेले आदित्य राऊत, यश कांबळे, अनिकेत हिवराळे, प्रेम आदमाने आणि आनंद नरवडे हे सर्व जण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथील आहेत.
१. छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. हे सर्व जण समुद्रकिनार्यावर फिरण्यासाठी गेले होते. यातील ८ जण समुद्रात पोहोत असतांना सर्व जण प्रवाहामध्ये समुद्रात ओढले गेले.
२. घटनेची माहिती समजताच स्थानिक प्रशासन, पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी आले. ३ तरुणांना वाचवण्यात यश आले असून अन्य ५ जण मात्र बेपत्ता आहेत. बोटींच्या साहाय्याने बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
३. समुद्रातील पाण्याचा वेगवान प्रवाह आणि उसळत्या लाटा यांमुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
१ सहस्र ४४५ कोटी रुपयांच्या ‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्या’चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ !
E-Cigarette Mumbai Schools : मुंबईतील प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थी ई-सिगारेट ओढत असल्याचे आढळले : शाळेकडून पालकांना सतर्क रहाण्याची सूचना !
कैराना (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाच्या विवाह समारंभात आढळले गोमांसाचे पदार्थ !
TMC, BJP Workers Clash : कोलकाता विमानतळावर तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट
Karnataka Fake Doctors : दावणगेरे (कर्नाटक) जिल्ह्यात ४० बनावट डॉक्टर आढळले !
पदपथावरून चालणे हा लोकांचा मूलभूत अधिकार ! – Supreme Court