‘१५.२.२०२६ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘साधकांनो, काळानुसार साधना म्हणून रामराज्याच्या स्थापनेसाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करा !’, असा संदेश प्रसिद्ध झाला होता. तेव्हापासून मी हा नामजप करत आहे. हा नामजप करत असतांना मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. आरंभी काही काळ मला हा नामजप श्वासासह करणे कठीण जात होते. नंतर काही कालावधीने माझा श्वासासह नामजप होऊ लागला.
२. नंतर एक दिवसाने ‘हा नामजप करत असतांना माझ्या दोन्ही नाड्या (सूर्यनाडी आणि चंद्रनाडी) चालू असून सुषुम्ना नाडीही उघडली आहे’, असे मला जाणवू लागले.

३. ‘शरिरात चैतन्याचा एक प्रवाह वहात असून प्रत्येक पेशी नाम घेत आहे’, असे मला अधूनमधून जाणवत आहे. त्या वेळी ‘माझे नाम शब्दाच्या पलीकडे चालू असून माझे लक्ष केवळ श्वासावर केंद्रित होत आहे. तेव्हा केवळ ‘नाम आणि मी’, असे होऊन ‘काही न करता केवळ तो आनंद अनुभवावा’, असे मला वाटले. त्या वेळी मला अधूनमधून मनाची निर्विचार अवस्था अनुभवायला मिळाली.‘या स्थितीतून बाहेर पडू नये’, असे मला वाटले.
४. मी नामजप करत असतांना ‘माझ्या पायाच्या वरील बाजूने सतत काहीतरी बाहेर पडत आहे’, असे मला जाणवते.
५. आता माझे नामस्मरण शब्दांमध्ये होत नसून ‘केवळ नामजपाची स्पंदने अनुभवणे’, असे होत आहे. ‘माझा मधूनच ‘सोऽहम्’ असा नामजप चालू होऊन मी सूक्ष्म धाग्याने ईश्वराशी जोडला गेलो आहे’, असे मला जाणवते आणि काही वेळाने माझे केवळ श्वासावरच लक्ष केंद्रित होते अन् मन शांत होते.
या अनुभूती दिल्याबद्दल मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता (वय ७० वर्षे), पुणे (२३.२.२०२६)
हिंदु धर्माच्या शिकवणीला चुकीचे म्हणणारे बुद्धीप्रामाण्यवादी !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने श्री राजमातंगी महायज्ञाच्या संदर्भातील सेवा करतांना आणि प्रत्यक्ष यज्ञस्थळी साधिकेला आलेल्या अनुभूती
धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळा (श्री सरस्वतीदेवीचे मंदिर) नमाजमुक्त होणे आणि लगेचच प्रभादेवी, मुंबई येथे श्री राजमातंगीदेवीचा महायज्ञ होणे, हे दैवी संकेत !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट वाचतांना श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील अद्वैताच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
धर्मांधांनी केलेली राष्ट्रहानी आणि त्याकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष !