भारतीय विचार, आचार, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचे महत्त्व !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘अनेकांच्या दृष्टीला भारतीय विचार, भारतीय प्रभा, आचार–व्यवहार, तत्त्वज्ञान आणि साहित्य प्रथमदर्शनी चमत्कारिक वाटते; परंतु तेथेच न थबकता ते जर त्यांचे नेटाने अध्ययन करतील, मन लावून चिकाटीने भारतीय ग्रंथांचे अनुशीलन करतील, भारतीय आचार–व्यवहारांच्या मुळाशी असलेल्या महान तत्त्वांची नीट ओळख करून घेतील, तर त्यांच्यापैकी ९९ टक्के लोक भारतीय विचारांच्या सौंदर्याने आणि भारतीय भावांनी मुग्ध होऊन गेल्याचे तुम्हाला आढळून येईल.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)