१० गावांत १३ विहिरींचे अधिग्रहण, ५ टँकरद्वारे पुरवठा
आटपाडी आणि जत तालुक्यांतील गावांना प्रशासकीय साहाय्य

सांगली – जिल्ह्यावर सध्या भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबवल्या जात आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील १० गावांमध्ये १३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून ५ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी दिली.
सध्या आटपाडी तालुक्यातील पिंपरी बु. कुरुंदवाडी, आंबेवाडी, पिंपरी खु. आणि जत तालुक्यातील गिरगाव अन् सिंदूर या गावांमध्ये टँकरने पाणी दिले जात आहे, तसेच खानापूर, शिराळा, तासगाव, जत आणि कवठेमहांकाळ या टंचाईग्रस्त तालुक्यांतील विविध गावांमध्ये विहिरी अन् कूपनलिका अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
विटा (सांगली) येथे लसीकरणानंतर ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या !
सांगली येथे भरधाव चारचाकीची अनेक वाहनांना धडक; चालक पसार
नसरापूर प्रकरणी आरोपीने चिमुरडीच्या मृत्यूनंतरही मृतदेहावर केले अत्याचार !
कृष्णा नदीपात्रात रासायनिक प्रदूषण नाही ! – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्पष्टीकरण
कोल्हापुरात पाणीबाणी; नगरसेवक आक्रमक !
सांगली येथे महापालिकेच्या स्वच्छता अधिकार्याला महिलेकडून मारहाण !