सांगली जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !

  • १० गावांत १३ विहिरींचे अधिग्रहण, ५ टँकरद्वारे पुरवठा

  • आटपाडी आणि जत तालुक्यांतील गावांना प्रशासकीय साहाय्य

प्रतिकात्मक चित्र

सांगली – जिल्ह्यावर सध्या भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबवल्या जात आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील १० गावांमध्ये १३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून ५ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी दिली.

सध्या आटपाडी तालुक्यातील पिंपरी बु. कुरुंदवाडी, आंबेवाडी, पिंपरी खु. आणि जत तालुक्यातील गिरगाव अन् सिंदूर या गावांमध्ये टँकरने पाणी दिले जात आहे, तसेच खानापूर, शिराळा, तासगाव, जत आणि कवठेमहांकाळ या टंचाईग्रस्त तालुक्यांतील विविध गावांमध्ये विहिरी अन् कूपनलिका अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

संपादकीय भूमिका

जनतेला पाण्याचा वापर काटकसरीने करणे आणि पर्यावरण पूरक कृती करायला शिकवणे आवश्यक !