(म्हणे) ‘भाजपने पसरवलेल्या विषामुळे देशातील बहुसंख्य समाज विषारी झाला आहे !’ – Samajwadi Party MP Javed Ali

समाजवादी पक्षाचे खासदार जावेद अली यांचे विधान

समाजवादी पक्षाचे खासदार जावेद अली

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – भाजपने पसरवलेले विष बहुसंख्य जनता गिळू लागली आहे आणि ती बर्‍याच अंशी विषारी झाली आहे. मी आरोप करत नाही; पण भाजपने असे वातावरण निर्माण केले आहे की, आज उत्तरप्रदेश आणि देशामध्ये एकमेकांवर जो विश्वास होता, त्यात धर्माच्या आधारावर मोठी घट झाली आहे आणि तो विश्वास तुटला आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार जावेद अली यांनी येथे केला. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

संपादकीय भूमिका

  • काश्मीरमध्ये साडेचार लाख हिंदूंना विस्थापित होण्यामागे तेथील बहुसंख्य मुसलमानांना कुणी विष पाजले होते ?, हे जावेद अली सांगतील का ?
  • जर देशातील बहुसंख्य समाज विषारी झाला असता, तर त्यांच्यावर आक्रमण करणारा एकही धर्मांध शेष राहिला नसता !