‘श्री संत तुकाराम महाराज संस्थान’चा निर्णय

देहूगाव (पुणे) – जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पालखी रथ ओढण्याचा आणि चौघडागाडीचा मान यंदा ‘श्री संत तुकाराम महाराज संस्थान’च्या वतीने खरेदी केलेल्या बैलजोड्यांना देण्यात येणार असल्याची माहिती ‘पालखी सोहळा प्रमुख’ विक्रमसिंह महाराज मोरे यांनी दिली. मोरे महाराज म्हणाले, ‘‘यंदाही पालखी रथासाठी २ बैलजोड्या आणि चौघडा गाडीसाठी १ अशा खिलार जातीच्या देखण्या, तंदुरुस्त अन् सक्षम ३ बैलजोड्या खरेदी करण्यात येत आहेत. त्यामुळे इतर कोणत्याही बैलजोड्या जुंपण्याचा प्रश्न येत नाही.’’
सातारा जिल्ह्यातील बावधन गाव परिसर आणि कर्नाटक राज्यात या बैलजोड्यांचा शोध घेतला जात आहे. यापूर्वी परिसरातील शेतकर्यांच्या बैलजोड्यांना संधी देण्यात आली होती. ‘संस्थानने घेतलेल्या निर्णयाला परिसरातील शेतकर्यांनी साहाय्य करावे’, असेही आवाहन मोरे यांनी केले. ‘देहू ते श्रीक्षेत्र पंढरपूर आणि पुन्हा पंढरपूर ते श्रीक्षेत्र देहू असा ३१ दिवसांचा पालखी प्रवास या बैलजोड्या करणार आहेत. पालखी सोहळा पूर्ण झाल्यानंतर इच्छुक शेतकर्यांकडून मागणी आल्यास बैलजोड्यांची विक्री केली जाणार आहे’, असेही मोरे महाराज यांनी सांगितले.
‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !
विशेष न्यायालयाने पोलीस उपअधीक्षकाचा जामीन फेटाळला !
१०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे होणार !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील उर्वरित ४ कळस सोन्याचे करण्याचा संकल्प !
श्रीगोंदा (अहिल्यानगर) येथे लाखो रुपयांचा गुटखा जप्त