सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !

  • डेहराडून (उत्तराखंड) येथील घटना

  • पाण्याच्या वादातून हत्या

  • हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी मुसलमानांच्या घरांवर केली दगडफेक

  • प्रशासनाने आरोपी मुसलमानांची अवैध घरे पाडली, १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

प्रतिकात्मक छायाचित्र

डेहराडून (उत्तरप्रदेश) – येथील सहसपूर भागातील बैरागीवाला येथे भाजपचे युवा नेते विनोद कुमार यांची मुसलमानांच्या जमावाने हातोड्याने वार करून हत्या केली. १३ जूनच्या सायंकाळी झालेल्या या घटनेनंतर हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी याचा तीव्र शब्दांत निषेध करत मुसलमानांच्या घरांवर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी १२ मुसलमानांच्या नावे गुन्हा नोंदवला आहे, तसेच आरोपी मुसलमानांची अवैध घरे बुलडोझरद्वारे पाडल्याचे समोर आले आहे. विनोद कुमार हे भाजपच्या इतर मागासवर्गीय मोर्चाचे जिल्हा सामाजिक माध्यम समन्वयक होते.

१. शेजारी रहाणारा इम्तियाज याच्यासोबत विनोद कुमार आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यात पाण्यावरून जुना वाद होता. १३ जूनला या सूत्रावरून पाणी दिल्यामुळे पुन्हा वाद झाला. यानंतर लगेचच शस्त्रधारी मुसलमानांच्या जमावाने विनोद कुमार यांच्या घरावर आक्रमण केले.

२. या वेळी विनोद यांची हत्या करण्यात आली. तसेच त्यांचे भाऊ अशोक, राजेश आणि वहिनी सुषमा गंभीर घायाळ झाले.

३. विनोद यांचा घायाळ भाऊ अशोक यांनी पोलीस तक्रारीत म्हटले की, यापूर्वी शेजारच्या शेतातील पाण्यावरून वाद झाला होता. हे शेत इम्तियाजच्या मालकीचे आहे. १३ जूनच्या सायंकाळी ६ वाजता रझ्झाक, इम्तियाज, अमन, युनूस, शाहबाज, शराफल अली, मासूम, आदिल, शामून, सलमान, जावेद,  इंतजार आणि बैरागीवाला येथील अनुमाने ३०-३५ इतर रहिवासी, काठ्या, लाकडी फळ्या, हातोडे आणि फावडी घेऊन आमच्या घरात घुसले. त्यांनी आम्हा कुटुंबियांवर आक्रमण केले. यामध्ये विनोदची हातोड्याने हत्या करण्यात आली.

संपादकीय भूमिका

  • राज्यात भाजपचे सरकार असूनही तेथील धर्मांध मुसलमान सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या हत्या करतात, याचा अर्थ त्यांना सरकारचे काहीच भय राहिलेले नाही. अशांच्या मुसक्या आवळणे काळाची आवश्यकता !
  • पाण्यावरून वाद झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून मुसलमानांचा जमाव शस्त्रांसह आक्रमण करतो, यावरून हे आक्रमण पूर्वनियोजित असल्याचेच लक्षात येते. अशांचा सामना करण्यासाठी हिंदू सक्षम नाहीत, हेच वारंवार घडणार्‍या अशा घटना दर्शवतात. ही स्थिती बहुसंख्यांक हिंदूंसाठी लज्जास्पद !