
नवी देहली – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् ‘डी.आर्.डी.ओ.’ने बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या सलग ३ यशस्वी चाचण्या पूर्ण केल्या. १० आणि ११ जून या दिवशी झालेल्या या चाचण्यांमध्ये इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांनी लक्ष्य अचूकपणे भेदले. त्यामुळे भारताकडे आता शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. यासह भारत अशा प्रकारची क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली असलेल्या निवडक देशांच्या गटात सहभागी झाला आहे.
याच कालावधीत नौदलासाठी विकसित करण्यात आलेल्या मध्यम पल्ल्याच्या नौकाविरोधी क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणीही यशस्वी झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीसाठी ‘डी.आर्.डी.ओ.’चे अभिनंदन करत ‘यामुळे देशाची सुरक्षा सज्जता आणि संरक्षणक्षेत्रातील आत्मनिर्भरता अधिक बळकट होईल’, असे म्हटले आहे.
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या निवासस्थानांवर ‘ईडी’ची धाड
Abhishek Banerjee’s Home Raid : बंगाल पोलिसांकडून मध्यरात्री अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर धाड
कर्नाटक : पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात असल्याचे उघड !
Puneeth kerehalli : हिंदुत्वनिष्ठ पुनीत केरेहळ्ळी यांना पोलिसांकडून रायचुरू जिल्हाबंदी