‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना प्रश्न विचारणे आणि त्याचे उत्तर मिळेपर्यंत तो प्रश्न, तसेच पुढे ते उत्तरही काही घंट्यांत विसरून जाणे’, यांमागील कारणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रश्न :

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘मी सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सतत प्रश्न का विचारतो ? मला एवढी जिज्ञासा का आहे ? माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याने मला तात्कालिक आनंद होतो. उत्तर मिळेपर्यंत मी तो प्रश्न विसरूनही गेलेलो असतो आणि उत्तर मिळाल्यावर ते उत्तरही काही घंट्यांत विसरून जातो’, यांचे कारण काय ?

उत्तर :

श्री. राम होनप : 

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील समष्टीप्रती असलेल्या प्रीतीमुळे त्यांनी समष्टीचे शंकानिरसन होण्यासाठी ज्ञानकार्य हाती घेतले असणे

श्री. राम होनप

‘सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांत समाज सात्त्विक होता. त्या काळी बहुतांश लोकांमध्ये ईश्वराप्रती भाव आणि श्रद्धा होती. त्यामुळे त्यांच्या मनात अध्यात्माविषयी फारसे प्रश्न नसत. कलियुगात, विशेषतः या विज्ञानयुगात लोकांचे साधना करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे त्यांच्यातील भाव आणि श्रद्धा न्यून होऊन त्यांचे मन अन् बुद्धी यांचे कार्य वाढले आहे. परिणामी अनेकांच्या मनात अध्यात्माविषयी विविध प्रश्न निर्माण होतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन धर्म आणि अध्यात्म यांच्या संबंधीच्या ज्ञानाचे महत्त्व जाणले आहे. सध्याच्या काळात जिज्ञासू आणि साधक यांच्या मनात ‘अध्यात्मात असे का सांगितले आहे ? त्यामागील अध्यात्मशास्त्र काय आहे ?’, असे असंख्य प्रश्न येतात. त्यांची उत्तरे विविध ग्रंथांमध्ये नाहीत. जिज्ञासू आणि साधक यांना समर्पक आणि अध्यात्मशास्त्रावर आधारित उत्तरे मिळाल्यास त्यांची साधना आणखी चांगली होणार आहे अन् त्यांचा ईश्वराप्रतीचा भाव आणि श्रद्धा वृद्धींगत होणार आहे, हे जाणून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर अध्यात्मातील विविध विषयांवरील प्रश्न सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विचारतात. गुरुकृपेमुळे त्या साधकांना त्या प्रश्नांची उत्तरे सूक्ष्मातून मिळतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे सर्वांवर निरपेक्ष प्रेम असल्याने त्यांनी हे ज्ञानकार्य हाती घेतले आहे.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची समष्टी कार्याप्रती असलेली तीव्र तळमळ !

‘अध्यात्मातील विविध विषयांचे अधिकाधिक ज्ञान जिज्ञासू अणि साधक यांच्यापर्यंत पोचावे’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सतत प्रश्न विचारतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची प्राणशक्ती अल्प असून त्यांना पुष्कळ थकवा असतो. असे असूनही ते सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेले ज्ञान पडताळतात; कारण सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांमध्ये समष्टी कार्याची तीव्र तळमळ आहे.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अंतर्ज्ञानाद्वारे अध्यात्मातील विविध प्रश्नांची निवड करता येणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना ‘जिज्ञासू आणि साधक यांच्या मनातील प्रश्न, तसेच पुढच्या िपढ्यांतील साधकांना साधना करतांना कोणते प्रश्न पडू शकतात ? , हे अंतर्ज्ञानाने समजते. अशा प्रश्नांची निवड करून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर ते प्रश्न सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विचारतात.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याने तात्कालिक आनंद होण्याचे कारण

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेल्या ज्ञानाद्वारे मिळते. तेव्हा ‘एक समष्टी कार्य पूर्ण झाले’, या विचाराने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना तात्कालिक आनंद होतो.

५. सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकाकडून प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले तो प्रश्न विसरून जाण्याचे कारण

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधना आणि भक्ती यांद्वारे ईश्वरप्राप्ती साध्य केली आहे. ईश्वर सर्वज्ञानी असतो. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना आता जाणून घेण्यासारखे काही शेष नाही. त्यामुळे त्यांना स्वतःचे काही प्रश्न नाहीत. ते बहुतेक वेळा निर्विचार अवस्थेत असतात. त्यांना काळानुरूप अंतर्ज्ञानाद्वारे जिज्ञासू आणि साधक यांच्या मनातील प्रश्न समजतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ते प्रश्न उत्तर मिळवण्यासाठी सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना दिले की, पुन्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर निर्विचार अवस्थेत जातात. त्यामुळे जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर एखादा प्रश्न सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकाला विचारतात, तेव्हा त्याचे उत्तर मिळेपर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर तो प्रश्न विसरून गेलेले असतात.

६. साधकाला सूक्ष्मातील ज्ञानाद्वारे प्राप्त झालेले उत्तर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले काही घंट्यांनी विसरून जाणाचे कारण

सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकाला सूक्ष्मातून ज्ञानाद्वारे मिळालेले उत्तर वाचल्यावर त्याचा परिणाम सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांच्यावर काही घंटे टिकतो. त्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची पुन्हा निर्विचार स्थिती होते आणि ईश्वरी प्रेरणेनुसार त्यांच्या पुढच्या कार्याला प्रारंभ होतो. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर काही घंट्यांनी ते उत्तर विसरून जातात.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १२.१.२०२६, वेळ : सकाळी १०.३० आणि कालावधी : २० सेकंद)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.