हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. ऋषिमुनींनी दाढी वाढवल्यामुळे सध्याच्या तरुणांनीही दाढी वाढवणे

‘सध्या अनेक तरुण मुले दाढी वाढवतांना दिसतात. खरेतर तरुणांनी दाढी वाढवायला नको. एका तरुणाने मला विचारले, ‘‘दाढी का वाढवायची नाही ? पूर्वी ऋषिमुनींनी दाढी वाढवलेलीच होती ना !’’ मी त्याला म्हणाले, ‘‘तुम्ही ऋषिमुनींनी दाढी वाढवलेली पहाता; पण त्यांनी केलेली साधना करता का ? त्यांच्याप्रमाणे केवळ दाढी वाढवता; पण कोणतीही साधना करत नाही. साधना केल्यामुळे दाढीमुळे निर्माण होणारा मनुष्यावरील रज-तमाचा प्रभाव नष्ट होतो. साधनेमुळे पंचमहाभूतांवरही अधिकार येतो.’’

२. समाजातील तरुणींनी ‘दुर्गादेवीने केस मोकळे सोडलेले असतात’, असे म्हणून स्वतःचे केसही मोकळे सोडणे

समाजातील अनेक मुली केस मोकळे सोडून फिरतांना दिसतात. आपण त्यांना ‘केस मोकळे सोडू नका’, असे सांगितल्यास त्या लगेच म्हणतात की, ‘दुर्गादेवीनेही केस मोकळेच सोडलेले असतात ना ?’ दुर्गादेवी केस कधी मोकळे सोडते, तर जेव्हा रणकंदन चालू होते तेव्हा ! दुर्गादेवीतील तमोगुण कार्यरत होतो. तेव्हा ती ‘रणचंडी’ बनते आणि स्वतःचे केस मोकळे सोडते ! हे रणचंडीचे रूप तिचे मारक तत्त्व असते.’’ साधकांना अशा प्रकारे सगळी उत्तरे ठाऊक असायला हवीत, म्हणजे योग्य त्या ठिकाणी आपण त्याविषयीचे धर्मशिक्षण देऊन ‘हिंदु धर्म आणि योग्य मार्गाने केलेली साधना’ यांवरील त्यांची श्रद्धा दृढ करू शकतो !’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, कांचीपूरम्, तमिळनाडू. (२१.९.२०२५)