समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘आता प्रश्न हा आहे की, धर्मामुळे खरोखर काही लाभ होतो का ? होय, अवश्य होतो. धर्म हा मनुष्याला अमर बनवतो, धर्माने मनुष्याला त्याच्या यथार्थ स्वरूपाचा साक्षात्कार घडवून दिला आहे. नरपशूचा तो नारायण करून सोडतो. हाच धर्मापासून होणारा महान लाभ होय. समाजातून धर्माला वगळा, मग काय उरेल ?, केवळ पशूंचा कळप !’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)


धर्म म्हणजे प्रत्यक्षानुभूती !

‘आपण ब्रह्मस्वरूप आहोत’, हे जाणून तद्रूप होणे, म्हणजे धर्म होय. धर्म म्हणजे प्रत्यक्षानुभूती होय.’

– स्वामी विवेकानंद