लोकांना दगडांद्वारे लक्ष्य करण्याचे नवे षड्यंत्र असल्याचा संशय !

नवी देहली – येथील काही उड्डाणपुलांच्या संरक्षक कठड्यांवर थोड्या थोड्या अंतराने ५ किलोपर्यंत वजन असणारे दगड ठेवण्यात आले आहेत. या उड्डाणपुलांवरून वेगाने गाड्या जात असल्याने पुलामध्ये काही प्रमाणात कंपने निर्माण होतात. या कंपनांमुळे कठड्यांवर ठेवलेले दगड पुलावरून खाली असलेल्या रस्त्यावर पडू शकतात. त्यामुळे खालून प्रवास करणार्या वाहनांवर किंवा पादचार्यांवर ते कोसळल्यास त्यांना गंभीर दुखापत किंवा मृत्यूही होऊ शकतो. या संदर्भातील एका व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. ‘यामागे मोठे षड्यंत्र आहे का ?’, याची चौकशी करण्याची मागणी देहली पोलिसांकडे केली जात आहे.
सामाजिक माध्यमांतून काही जणांनी हा व्हिडिओ शेअर करत त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ मयंक जैन यांनी ट्वीट करत म्हटले आहे, ‘आतंकवादी आणि जाळपोळ करणार्यांनी देहलीतील लोकांना लक्ष्य करण्यासाठी नवीन षड्यंत्र रचले आहे. उड्डाणपुलांच्या कठड्यांवर एका कटाद्वारे दगड आणि विटा ठेवण्यात आल्या आहेत.’ जैन यांनी हे ट्वीट नवी देहली पोलिसांना टॅग (सूचित करणे) केले आहे.
संपादकीय भूमिकासामान्य जनतेला जे दिसत आहे, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांना कसे दिसत नाही ? कि ते आंधळे आहेत ? |
पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !
ग्राहकांना प्रतिदिन मिळणार अधिकाधिक २०० लिटर डिझेल !
Northeast AFSPA Exit : पुढील वर्षापर्यंत एक-दोन राज्ये वगळता संपूर्ण ईशान्य भारतातून ‘सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा’ हटवला जाऊ शकतो ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
Jaspal Rana Passes Away : नेमबाज जसपाल राणा यांचे ४९ व्या वर्षी निधन
भारत आधीपासून जे आचरणात आणत होता, तेच पाश्चिमात्य देश आता शोधून काढत आहेत !
Supreme Court : गृहिणी या राष्ट्रनिर्मात्या ! – सर्वाेच्च न्यायालय