संपूर्ण समाजात समानता आणणे अशक्य असून चातुर्वर्णाला नावे ठेवणे अयोग्य !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

चातुर्वर्ण पद्धतीपेक्षा एकच पद्धत श्रेष्ठ ठरणे शक्य आहे ती, म्हणजे अलीकडच्या एक थोर व्यक्तीने म्हणजे गांधीजींनी सांगितली. गांधीजींच्या आदर्श समाजव्यवस्थेत ‘प्राध्यापक, वकील, डॉक्टर, इंजिनीयर, मंत्री, सचिव, व्यापारी, शेतकरी, कामकरी आणि भंगी यांचे उत्पन्न सारखेच पाहिजे. त्या सर्वांना सुखसोयी सारख्याच मिळाल्या पाहिजेत.’ या पद्धतीचा समाज ज्या क्षणी निर्माण होईल, तो बाह्य दडपणावाचून सुखाने नांदेल, त्याक्षणी मी म्हणेन की, चातुर्वर्ण मानण्याचे कारण नाही; पण ‘असा समाज जर निर्माण करता आला नाही, तर चातुर्वर्णाला नावे ठेवणे अयोग्य आहे.’

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘वाटा आपल्या हिताच्या’)