राज्यपालांकडून वटहुकूमावर स्वाक्षरी; आता पणनमंत्र्यांच्या अधिपत्याखाली होणार कारभार !

सांगली – सांगलीसह राज्यातील १२ प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांना आता ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यपालांनी या संदर्भातील वटहुकूमावर स्वाक्षरी केली आहे. या क्रांतीकारक निर्णयामुळे स्थानिक राजकीय नेत्यांच्या स्वार्थी राजकारणाला आणि मनमानी कारभाराला अटकाव बसणार आहे.
पहिल्या टप्प्यात सांगली, मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर यांसह १२ बाजार समित्यांचा यामध्ये समावेश आहे. नव्या रचनेनुसार अध्यक्षपदी थेट राज्याचे पणनमंत्री असतील, तर उपाध्यक्षपदी पणन राज्यमंत्री असतील. १६ सदस्यांच्या नव्या मंडळात कृषी आयुक्त, पणन संचालक यांच्यासह ५ शेतकरी प्रतिनिधी, ३ व्यापारी प्रतिनिधी आणि इतर राज्यांचे प्रतिनिधी अन् आयात-निर्यात क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असेल.
‘राष्ट्रीय बाजार’ दर्जासाठीचे निकष
बाजार समितीला हा दर्जा मिळण्यासाठी वार्षिक शेतमाल आवक ८ लाख ३ सहस्र मेट्रिक टनांहून अधिक असणे आणि देशातील किमान २ किंवा त्याहून अधिक राज्यांतून तेथे शेतमालाची आवक होणे बंधनकारक आहे.
शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांचे प्रश्न सोडवले जातील ! – अभिजित दीपके, कॉकरोच जनता पक्ष
सांगली, मिरज, कुपवाड शहरातील विद्युत् वाहिन्या भूमीगत करण्यासाठी २५० कोटी रुपयांची मागणी ! – सौ. नीता केळकर, संचालिका, महावितरण
वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्टमीटर बसवणे स्थगित ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
३७० कलम रहित करणे आणि श्रीराममंदिराची उभारणी, ही पंतप्रधान मोदी यांची महान कार्ये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
भायखळा आणि भिवंडी येथे ‘मराठी भाषा प्रशिक्षण केंद्र’ चालू करा ! – आमदार रईस शेख, समाजवादी पक्ष
भेसळ आणि दराच्या वादात गुर्हाळ व्यवसाय संकटात !