(म्हणे) ‘भारतात रहाण्याची मला लाज वाटते !’ – Kapil Sibal

  • तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवरील आक्रमणांवरून काँग्रेसचे नेते अधिवक्ता कपिल सिब्बल यांचा भारताला कलंकित करण्याचा प्रयत्न

  • भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी दर्शवला विरोध

काँग्रेसचे नेते अधिवक्ता कपिल सिब्बल

नवी देहली – तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावर झालेल्या आक्रमणांच्या प्रकरणी राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार अन् सर्वाेच्च न्यायालयातील ज्येष्ठ अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी ‘अशा घटना जिथे घडतात, त्या देशात मला रहाण्याची लाज वाटते’, असे विधान केले.

सिब्बल यांना प्रत्युत्तर देतांना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले,

‘‘देशाच्या सर्वोच्च न्यायालयात काम करून सिब्बल यांनी कोट्यवधी रुपये कमावले आणि तरीही त्यांना भारतात रहाण्याची लाज वाटते. सिब्बल म्हणतात की, त्यांना भारतात रहाण्याची लाज वाटते. तथापि वर्ष २०२१ मध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात भाजप अन् काँग्रेस यांच्या ३०० हून अधिक कार्यकर्त्यांची हत्या झाली, तेव्हा सिब्बल यांनी कधीही तोंड उघडले नाही. याखेरीज आर्.जी. कर महाविद्यालयातील डॉक्टरवरील बलात्कार, तसेच संदेशखालीसारख्या प्रकरणांमध्येही सिब्बल गप्प राहिले. भाजप सरकारशी राजकीय मतभेद असणे, हे एकवेळ समण्यासारखे आहे; परंतु भाजपला विरोध करण्याच्या नादात काही विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये देशावरच आक्रमण करण्याची प्रवृत्ती का दिसून येते ? भारताचा द्वेष का ?

संपादकीय भूमिका

  • बंगालमधील हिंदूंवर गेली अनेक दशके अनन्वित अत्याचार झाले. त्या वेळी कपिल सिब्बल यांना कधी लाज का वाटली नाही ? बंगाल बांगलादेश बनण्याच्या मार्गावर असतांना सिब्बल यांना कधीच का लाज वाटली नाही ?
  • अशा विधानांतून भारताची प्रतिमा मलीन करून सिब्बल यांच्यासारखे राजकारणी भारतद्वेष्ट्यांच्या हातात आयते कोलीत देतात. अशांना ‘त्यांची लाज टिकून राहील’, अशा देशात पाठवून दिले पाहिजे !