Assam UCC : आसाम विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर

गौहत्ती (आसाम) – आसाम विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक २५ मे या दिवशी सादर करण्यात आले. या विधेयकावर २७ मे या दिवशी चर्चा होईल. जर हे विधेयक संमत झाले, तर आसाम हा कायदा करणारे देशातील तिसरे असे राज्य बनेल. यापूर्वी उत्तराखंड आणि गुजरात या राज्यांनी हा कायदा संमत केला आहे. तसेच गोव्यामध्ये पोर्तुगीज काळापासून हा कायदा लागू आहे.

मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या मते, अनुसूचित जमाती (डोंगराळ) आणि अनुसूचित जमाती (मैदानी) हे या कायद्याच्या कक्षेतून बाहेर असतील. तसेच पारंपरिक धार्मिक विधी, प्रथा आणि अनुष्ठान यांनाही यातून सूट दिली जाईल.