
१. यज्ञस्थळाविषयी जाणवलेली सूत्रे
अ. ‘मुंबईतील नर्दुल्ला टँक मैदानात सनातन संस्थेने आयोजित केलेला राजमातंगी महायज्ञ होत होता. ते स्थळ एकदम चैतन्यमय जाणवत होते.
आ. तेथून सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत होती.
इ. यज्ञस्थळ एखाद्या तीर्थक्षेत्रासारखे वाटत होते, तसेच ‘तेथे देवतांची सभा भरली आहे’, असेही मला जाणवत होते.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे
अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडे पाहून ‘स्वर्गातून दोन देवी यज्ञस्थळी आल्या आहेत’, असे मला जाणवले.
आ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चेहर्यावर पुष्कळ तेज दिसत होते आणि ‘देवीच प्रगट झाली आहे’, असे जाणवून ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे मला वाटत होते.

३. पुरोहितांविषयी जाणवलेली सूत्रे
अ. यज्ञस्थळी ‘यज्ञाला बसलेले सर्व पुरोहित हे देवतांचे दूत असून देवतांनी त्यांना यज्ञ करण्यासाठी पृथ्वीवर पाठवले आहे’, असे मला जाणवले.
आ. ‘यज्ञाचे पौरोहित्य करणारे सगळे ऋषिमुनीच आहेत’, असे त्यांच्याकडे पाहून मला जाणवत होते. ते ऋषिमुनींप्रमाणे तन्मय होऊन यज्ञ करत होते. हे पाहून माझी भावजागृती होत होती.
इ. ‘यज्ञस्थळी सजवलेले व्यासपीठ, म्हणजे जणू श्री राजमातंगीदेवीचा दरबारच आहे’, असे मला जाणवले. ‘व्यासपिठावरून पुरोहित जे मंत्रपठण करत होते, त्याचे चैतन्य सर्वत्र प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते.
ई. मला यज्ञात आहुती देणारे पुरोहित शक्तिमान हनुमानासारखे आणि अन्य पुरोहित वानरसेनेसारखे वाटत होते.
४. ‘मी यज्ञस्थळीच बसलेले आहे’, असे मला जाणवत होते. इतके चैतन्यमय वातावरण देवद आश्रमातही जाणवत होते.
५. ‘श्री राजमातंगीदेवीचा यज्ञ पृथ्वीवर होत नसून स्वर्गातच चालू आहे’, असे मला वाटले.
६. यज्ञासाठी ५ घंटे एका जागेवर बसूनही मला कोणताच त्रास झाला नाही. ‘यज्ञस्थळातील चैतन्य आणि ऊर्जा यांमुळे मला एवढा वेळ बसता आले’, असे मला जाणवले.
७. ‘या यज्ञाचे चैतन्य सर्वत्र पसरत आहे. या यज्ञाचा भारत देशाला आणि भारतियांना नक्कीच लाभ होणार आहे. साधक आणि हितचिंतक यांचे रक्षण होणार आहे’, याविषयी माझी निश्चिती झाली.’
– श्रीमती शशिकला भगत (वय ७० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.५.२०२६)
हनुमान जयंतीच्या दिवशी चारचाकी गाडीने जात असतांना साधकाची दृष्टी आकाशाकडे गेल्यावर त्याला ढगांमध्ये झालेले मारुतिरायाचे दर्शन !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना प्रश्न विचारणे आणि त्याचे उत्तर मिळेपर्यंत तो प्रश्न, तसेच पुढे ते उत्तरही काही घंट्यांत विसरून जाणे’, यांमागील कारणे
पत्नीच्या मेंदूच्या शस्त्रकर्माच्या वेळी साधकाने अनुभवलेली गुरुकृपा !