
‘वाराणसी आश्रमातील ध्यानमंदिरात श्रीरामाची विलोभनीय मूर्ती आहे. प्रतिदिन त्या मूर्तीची पूजा होते, तसेच सकाळी आणि संध्याकाळी तेथे आरती केली जाते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या ६ ते १० मे २०२६ या कालावधीत प्रतिदिन सकाळी ६.४० वाजता ध्यानमंदिराच्या खिडकीतून सूर्याचे किरण प्रभु श्रीरामाच्या मूर्तीवर पडलेले दिसले. अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीवर सूर्यतिलक होण्यासाठी व्यवस्था केली आहे; मात्र वाराणसी आश्रमात अशी कुठलीही व्यवस्था केली नसतांनाही सूर्याचे किरण प्रभु श्रीरामाच्या मस्तकापासून अनाहतचक्रापर्यंत पडत होते. साक्षात् सूर्यदेवाने आम्हा सर्व साधकांना काळानुसार दिलेली ही मोठी अनुभूती आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कालावधीत अशी अनुभूती येणे’, म्हणजे ‘काळानुसार गुरुदेवांच्या श्रीविष्णुरूपातील श्रीरामतत्त्व जागृत झाले आहे आणि हा रामराज्याच्या स्थापनेचा दैवी संकेत आहे’, असे आम्हाला वाटले. विशेष म्हणजे हे सूर्यकिरण केवळ ५ दिवस, म्हणजे ६ ते १० मे २०२६ या कालावधीतच श्रीराममूर्तीवर पडलेले दिसले. त्यानंतर त्यांची दिशा पालटली.’
– (सद्गुरु) नीलेश सिंगबाळ (वय ५९ वर्षे), पूर्व भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (१८.५.२०२६)
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !