सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कालावधीत वाराणसी आश्रमातील ध्यानमंदिराच्या खिडकीतून तेथील प्रभु श्रीरामाच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडणे

ध्यानमंदिराच्या खिडकीतून प्रभु श्रीरामाच्या मूर्तीवर पडलेले सूर्याचे किरण

‘वाराणसी आश्रमातील ध्यानमंदिरात श्रीरामाची विलोभनीय मूर्ती आहे. प्रतिदिन त्या मूर्तीची पूजा होते, तसेच सकाळी आणि संध्याकाळी तेथे आरती केली जाते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या ६ ते १० मे २०२६ या कालावधीत प्रतिदिन सकाळी ६.४० वाजता ध्यानमंदिराच्या खिडकीतून सूर्याचे किरण प्रभु श्रीरामाच्या मूर्तीवर पडलेले दिसले. अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीवर सूर्यतिलक होण्यासाठी व्यवस्था केली आहे; मात्र वाराणसी आश्रमात अशी कुठलीही व्यवस्था केली नसतांनाही सूर्याचे किरण प्रभु श्रीरामाच्या मस्तकापासून अनाहतचक्रापर्यंत पडत होते. साक्षात् सूर्यदेवाने आम्हा सर्व साधकांना काळानुसार दिलेली ही मोठी अनुभूती आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कालावधीत अशी अनुभूती येणे’, म्हणजे ‘काळानुसार गुरुदेवांच्या श्रीविष्णुरूपातील श्रीरामतत्त्व जागृत झाले आहे आणि हा रामराज्याच्या स्थापनेचा दैवी संकेत आहे’, असे आम्हाला वाटले. विशेष म्हणजे हे सूर्यकिरण केवळ ५ दिवस, म्हणजे ६ ते १० मे २०२६ या कालावधीतच श्रीराममूर्तीवर पडलेले दिसले. त्यानंतर त्यांची दिशा पालटली.’

– (सद्गुरु) नीलेश सिंगबाळ (वय ५९ वर्षे), पूर्व भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (१८.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक