
‘वाराणसी आश्रमातील ध्यानमंदिरात श्रीरामाची विलोभनीय मूर्ती आहे. प्रतिदिन त्या मूर्तीची पूजा होते, तसेच सकाळी आणि संध्याकाळी तेथे आरती केली जाते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या ६ ते १० मे २०२६ या कालावधीत प्रतिदिन सकाळी ६.४० वाजता ध्यानमंदिराच्या खिडकीतून सूर्याचे किरण प्रभु श्रीरामाच्या मूर्तीवर पडलेले दिसले. अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीवर सूर्यतिलक होण्यासाठी व्यवस्था केली आहे; मात्र वाराणसी आश्रमात अशी कुठलीही व्यवस्था केली नसतांनाही सूर्याचे किरण प्रभु श्रीरामाच्या मस्तकापासून अनाहतचक्रापर्यंत पडत होते. साक्षात् सूर्यदेवाने आम्हा सर्व साधकांना काळानुसार दिलेली ही मोठी अनुभूती आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कालावधीत अशी अनुभूती येणे’, म्हणजे ‘काळानुसार गुरुदेवांच्या श्रीविष्णुरूपातील श्रीरामतत्त्व जागृत झाले आहे आणि हा रामराज्याच्या स्थापनेचा दैवी संकेत आहे’, असे आम्हाला वाटले. विशेष म्हणजे हे सूर्यकिरण केवळ ५ दिवस, म्हणजे ६ ते १० मे २०२६ या कालावधीतच श्रीराममूर्तीवर पडलेले दिसले. त्यानंतर त्यांची दिशा पालटली.’
– (सद्गुरु) नीलेश सिंगबाळ (वय ५९ वर्षे), पूर्व भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (१८.५.२०२६)
साधनेचे अद्वितीयत्व जाणून घ्या !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
‘संगीतातील केवळ ७ स्वरांतून सर्व भाव-भावना कशा व्यक्त होतात ?’, या संदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !