वांद्रे येथे पोलिसांवर दगडफेक करणार्‍या १०० ते १५० जणांविरुद्ध गुन्हा नोंद  : १६ जणांना अटक

मुंबई – वांद्रे पूर्वेतील गरीबनगरमध्ये अवैध बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या अंतर्गत पोलिसांवर दगडफेक करणार्‍या १०० ते १५० जणांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली. त्या दगडफेकीत ५ पोलीस घायाळ झाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण ५०० अवैध अतिक्रमणे हटवली जाणार आहेत. अतिक्रमण हटवण्याचे काम ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

संपादकीय भूमिका

केवळ गुन्हा नोंदवून नव्हे, तर संबंधितांना कठोर शिक्षा केल्यासच अशा घटनांना आळा बसेल ! यासह पोलिसांनीही स्वतःचा धाक निर्माण करायला हवा !