नरसंहाराचा इतिहास असलेल्या देशाने भारताला उपदेश करू नये ! – हरीश पार्वतानेनी, भारताचे संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी

  • भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला सुनावले खडेबोल

  • पाकने काश्मीरचा प्रश्न केला होता उपस्थित !

हरीश पार्वतानेनी

न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने पाकिस्तानला  शब्दांत फटकारले. परिषदेत एका चर्चेच्या वेळी पाकने काश्मीरचे सूत्र उपस्थित करत भारताने त्यावर अनधिकृत नियंत्रण मिळवल्याचे आणि तेथे जनमत चाचणी घेण्याचे वक्तव्य केले असता भारताच्या संयुक्त राष्ट्रांमधील स्थायी प्रतिनिधीने पाकवर जोरदार टीका केली. भारताचे प्रतिनिधी हरीश पार्वतानेनी म्हणाले की, नरसंहाराचा दीर्घकाळ डागाळलेला इतिहास असलेल्या पाकने भारताच्या पूर्णपणे अंतर्गत असलेल्या सूत्रांचा उल्लेख करणे, हा विरोधाभास असून त्याला असे करण्याचा कोणताही अधिकार नाही.

पाकने या वर्षाच्या आरंभी अफगाणिस्तानवर केलेल्या भीषण आक्रमणांचा संदर्भ देत पार्वतानेनी पुढे म्हणाले की, रमझानच्या पवित्र महिन्यात पाकने काबूलमधील एका रुग्णालयावर एक भीषण आक्रमण केले होते. हिंसेच्या या अमानवीय कृत्यात २६९ नागरिक ठार झाले. ही घटना कोणतेही सैनिकी लक्ष्य नसलेल्या ठिकाणी घडली. ती कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही. असे असतांनाही आंतरराष्ट्रीय कायद्यातील नियमांच्या तत्त्वांची भाषा करणे, हे पाकिस्तानचे ढोंगीपणाचे कृत्य आहे.

संपादकीय भूमिका

भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला आरसा दाखवण्यासह संपूर्ण काश्मीरला स्वत:च्या नियंत्रणात घेण्यासाठी व्यूहरचना आखून तशी कृती केली पाहिजे. यानेच हे खडेबोल शाब्दिक वचक न रहाता त्याला कृतीचे पाठबळ मिळेल !