Kondhva Pune Violence : मुसलमानांकडून हिंदु तरुणाचे ‘मॉब लिंचिंग’ करण्याचा प्रयत्न !

  • मुसलमानबहुल कोंढवा (पुणे) येथील लहान मुलांच्या वादावादीचे प्रकरण

  • रस्त्यावर ‘अल्ला हू अकबर’च्या (‘अल्ला महान आहे’ याच्या) घोषणा देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

(मॉब लिंचिंग म्हणजे जमावाकडून हत्या)

पुणे – येथील मुसलमानबहुल भाग असलेल्या कोंढव्यातील ‘ईशा बेला सोसायटी’मधील लहान मुलांच्या वादावादीचे प्रकरण समोर आले. येथील धर्मांध मुसलमान जमावाने रस्त्यावर उतरून एका हिंदु तरुणाचे ‘मॉब लिंचिंग’ करण्याचा प्रयत्न केला. जमावाने रस्ता रोखून वाहतूक कोंडी करण्याचाही प्रयत्न केला. रस्त्यावर येऊन घोेषणा करत परिसरात दहशत निर्माण केली. हा जमाव कोंढवा पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्यानंतर जमावाने पोलीस ठाणे आणि पोलीस यांवर दगडफेक केली. परिणामी पोलिसांनी दंगलखोरांवर लाठीमार करत जमाव पांगवला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आक्रमणकर्त्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम चालू केली आहे. ही घटना १८ मेच्या मध्यरात्री घडली.

१. कोंढव्यातील ‘ईशा बेला सोसायटी’मध्ये एका कार्यक्रमाला लहान मुले आली होती. त्यांच्यात वाद होऊन त्यांनी एकमेकांना मारहाण केली. या वादावादीमध्ये मोठ्या लोकांनी हस्तक्षेप करत यास धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला.

२. जमाव रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण केला. त्या वेळी रस्त्यावरील काही लोकांनाही मारहाण करण्यात आली. ‘अल्लाहू अकबर’, ‘ला इलाहा इल्लल्लाह’ (अल्लाखेरीज अन्य दुसरा कुणी पूजनीय नाही) अशा घोषणा देऊन रस्ता अडवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

३. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार स्वत: घटनास्थळी आले होते.

४. सध्या कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने वातावरण शांत असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

संपादकीय भूमिका

  • अशा घटना घडायला पुणे हे भारतात आहे कि बांगलादेश अथवा पाकिस्तानात ? अशा घटना पुढे घडू न देण्यासाठी पुणेकरांनी सक्षम हिंदूसंघटनासाठी पुढे सरसावले पाहिजे !
  • लहान मुलांच्या वादावादीवरून धर्मांध मुसलमानांचा जमाव एवढा आक्रमक होतो, यावरून हे लोक दंगल करण्याचे निमित्तच शोधत असतात, असेच म्हटले पाहिजे !
  • दंगलखोरांची वृत्ती मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी योगी आदित्यनाथ शासनाप्रमाणे आता बुलडोझर कारवाईसारख्या उपाययोजना काढल्या पाहिजेत, असेच आता राज्यातील हिंदूंना वाटू लागले आहे !