
नवी देहली – केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी नुकतेच सांगितले की, मतदारसूचीतून इतर सर्व देशांच्या नागरिकांची नावे काढून टाकली पाहिजेत. जर देशाच्या मतदारसूचीत रोहिंग्या किंवा बांगलादेशी व्यक्तीचे नाव आढळले, तर ते काढून टाकले पाहिजे. केवळ भारतीय नागरिकांचीच नावे या मतदारसूचीत राहिली पाहिजेत, असे रेड्डी म्हणाले. (त्यासोबतच रोहिंग्या किंवा बांगलादेशी घुसखोरांची नावे मतदारसूचीत समाविष्ट करण्यास उत्तरदायी असलेल्या अधिकार्यांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)
१. सर्व राजकीय पक्षांनी ‘बूथ लेव्हल एजंट’ (बी.एल्.ए.) नियुक्त करावे आणि मतदारसूचीच्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (एस्.आय.आर्.) प्रक्रियेच्या वेळी निवडणूक आयोगाला सहकार्य करावे, असे आवाहन रेड्डी यांनी केले.
२. जी. किशन रेड्डी यांनी भारतियांना असा विश्वास दिला आहे की, भाजपचे मतदानकेंद्र स्तरावरील कार्यकर्ते या सूचीविषयी निवडणूक आयोगाला पूर्ण सहकार्य करतील.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक