
ढाका (बांगलादेश) – भारतासोबतच्या संबंधांचे भविष्य गंगा पाणी वाटप करारावर अवलंबून असेल, असे विधान बांगलादेशच्या सत्ताधारी ‘बी.एन्.पी.’ पक्षाचे सरचिटणीस आणि ग्रामीण विकास मंत्री मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी केले. भारत आणि बांगलादेश यांच्यात वर्ष १९९६ मध्ये झालेला गंगा पाणी वाटप करार याच वर्षी डिसेंबरमध्ये संपणार आहे. बांगलादेशसाठी गंगा नदी, जिला तिथे ‘पद्मा’ म्हणतात, शेती, जैवविविधता आणि पाणीपुरवठा या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
ढाका येथे आयोजित एका कार्यक्रमात आलमगीर म्हणाले की, बांगलादेश भारताला स्पष्ट संदेश देऊ इच्छितो की, नवीन करार बांगलादेशी जनतेच्या गरजा आणि हितानुसार असावा. जोपर्यंत नवीन करार होत नाही, तोपर्यंत सध्याचा करार चालू ठेवावा. भविष्यातील पाणी करार कोणत्याही निश्चित वेळेच्या मर्यादेत नसावेत, असेही त्यांनी सुचवले.
भारताने म्हटले आहे की, दोन्ही देशांमधील पाणी संबंधित सर्व सूत्रांवर स्थापित द्विपक्षीय यंत्रणेद्वारे नियमित चर्चा चालू आहे.
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत
Europe Heatwaves : युरोपमध्ये उष्णतेची लाट : तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक