बंगालमध्ये ६४ वर्षांपूर्वी झालेल्या दंगलींत हिंदूंचा छळ आणि मुसलमानांचे लांगूलचालन यांचा पाया रचला गेला !

  • भाजपचे खासदार श्री. निशिकांत दुबे यांचा आरोप

  • हिंदूंच्या छळाला नेहरू उत्तरदायी असल्याचाही आरोप !

भाजपचे खासदार निशिकांत दुबे

नवी देहली – बंगालमध्ये ६४ वर्षांपूर्वी झालेल्या दंगलींत हिंदूंच्या छळाचा पाया रचला गेला, अशा शब्दांत भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस पक्षावर ‘एक्स’वर पोस्ट प्रसारित करून टीका केली. यास नेहरू उत्तरदायी असून हा काँग्रेसचा काळा अध्याय आहे, असेही त्यांनी सांगितले. खासदार दुबे यांनी त्यांच्या या पोस्टसमवेत काही कागदपत्रेही प्रसारित केली आहेत.

निशिकांत दुबे पुढे म्हणाले,

१. आज बंगालमध्ये हिंदूंचा छळ आणि मुसलमानांचे लांगूलचालन यांचा पाया ३ मे १९६२ या दिवशी रचला गेला. ३ ते ३० मे १९६२ या कालावधीत बंगालमधील मालदा, मुर्शिदाबाद, नदिया आणि कूचबिहार या जिल्ह्यांमध्ये  मोठ्या प्रमाणात हिंदु-मुसलमान दंगली झाल्या. यात मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक निर्वासित झाले.

२. अशीच परिस्थिती पूर्व पाकिस्तान आणि बांगलादेशातील हिंदूंची होत होती. एक तर हिंदू मारले गेले किंवा पळून निर्वासित झाले, जे बहुतेक मतुआ, म्हणजेच अनुसूचित जाती समुदायाचे आहेत. त्यांनाच मोदी सरकारने नागरिकता दिली.

३. नेहरूंनी कायम संसदेत आणि संसदेच्या बाहेर मुसलमानांची बाजू घेतली. राजगोपालचारी यांना लिहिलेल्या पत्रांतून काँग्रेसच्या मतपेढीच्या राजकारणाची माहिती मिळते. हे पत्रही खासदार दुबे यांनी प्रसारित केले आहे.

संपादकीय भूमिका

काँग्रेसच्या याच हिंदुद्वेषी धोरणामुळे आज देशातील ९ राज्यांत हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. अशी परिस्थिती अन्य राज्यांत येऊ द्यायची नसेल, तर हिंदूंनी आताच काँग्रेसला राजकीयदृष्ट्या नष्ट करण्याचा पाया रचायला हवा !