अर्जामध्ये धर्म म्हणून ‘इस्लाम’ आणि मातृभाषा म्हणून हिंदी न लिहिता ‘उर्दू’ लिहा ! – Maulana Khalid Rasheed Firangi Mahali

मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांचे जनगणनेवरून मुसलमानांना आवाहन

मौलाना खालिद रशीद फिरंगी महली

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – जनगणनेचा अर्ज भरतांना धर्माच्या ठिकाणी केवळ ‘इस्लाम’ असेच लिहावे. तसेच मातृभाषेच्या स्तंभात हिंदीऐवजी ‘उर्दू’ लिहावे, असे आवाहन येथील प्रसिद्ध मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांनी केले आहे.

मौलाना महली यांच्या मते, अनेकदा लोक सरसकट हिंदी लिहितात; परंतु स्वतःची अचूक ओळख नोंदवणे आवश्यक आहे. सरकार शासकीय योजना सिद्ध करतांना याच माहितीचा आधार घेते, त्यामुळे स्पष्ट माहिती असल्यास योजना सिद्ध करणे आणि कार्यवाही करणे सुलभ होते.

जनगणनेच्या अर्जात सर्व हिंदूंनी ‘संस्कृत’चा उल्लेख यासाठी करावा !

प्रत्येकाची मातृभाषा वेगवेगळी असली, तरी भारताची मूळ भाषा ही देवभाषा संस्कृत आहे. हिंदु प्रतिदिन प्रार्थना, मंत्र, श्लोक, तसेच पूजा विधी यांमध्ये संस्कृतचाच वापर करत असतो. संस्कृत सर्व भाषांची जननी आहे. ही भाषा जिवंत ठेवणे सर्वांचे दायित्व आहे. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार संपूर्ण देशात संस्कृत भाषिक लोकांची संख्या केवळ २ लाख होती, तर अरबी, फारसी अथवा उर्दू या परकीय आणि भारताशी दुरान्वयानेही संबंध नसणार्‍या भाषा बोलणार्‍या लोकांची संख्या यापेक्षा पुष्कळ अधिक होती अन् त्यांना सरकारी अनुदान आणि पाठिंबा देखील मिळाला.

संपादकीय भूमिका

जर असे आवाहन केले जात आहे, तर जर ‘हिंदूंनी ‘हिंदु’ आणि मातृभाषा म्हणून ‘संस्कृत’चा उल्लेख करावा’, असे आवाहन कुणी करत असेल, तर तेही चुकीचे ठरू नये !