मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांचे जनगणनेवरून मुसलमानांना आवाहन

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – जनगणनेचा अर्ज भरतांना धर्माच्या ठिकाणी केवळ ‘इस्लाम’ असेच लिहावे. तसेच मातृभाषेच्या स्तंभात हिंदीऐवजी ‘उर्दू’ लिहावे, असे आवाहन येथील प्रसिद्ध मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांनी केले आहे.
Maulana Khalid Rasheed Firangi Mahali has urged Muslims to mark “Islam” as religion and “Urdu” as mother tongue in census forms.
If such appeals are being made, is it unreasonable to expect Hindus to assert their identity too, by writing “Hindu” as religion and “Sanskrit” as… pic.twitter.com/OI1jGPr108
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 13, 2026
मौलाना महली यांच्या मते, अनेकदा लोक सरसकट हिंदी लिहितात; परंतु स्वतःची अचूक ओळख नोंदवणे आवश्यक आहे. सरकार शासकीय योजना सिद्ध करतांना याच माहितीचा आधार घेते, त्यामुळे स्पष्ट माहिती असल्यास योजना सिद्ध करणे आणि कार्यवाही करणे सुलभ होते.
जनगणनेच्या अर्जात सर्व हिंदूंनी ‘संस्कृत’चा उल्लेख यासाठी करावा !
प्रत्येकाची मातृभाषा वेगवेगळी असली, तरी भारताची मूळ भाषा ही देवभाषा संस्कृत आहे. हिंदु प्रतिदिन प्रार्थना, मंत्र, श्लोक, तसेच पूजा विधी यांमध्ये संस्कृतचाच वापर करत असतो. संस्कृत सर्व भाषांची जननी आहे. ही भाषा जिवंत ठेवणे सर्वांचे दायित्व आहे. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार संपूर्ण देशात संस्कृत भाषिक लोकांची संख्या केवळ २ लाख होती, तर अरबी, फारसी अथवा उर्दू या परकीय आणि भारताशी दुरान्वयानेही संबंध नसणार्या भाषा बोलणार्या लोकांची संख्या यापेक्षा पुष्कळ अधिक होती अन् त्यांना सरकारी अनुदान आणि पाठिंबा देखील मिळाला.
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक
महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !