
‘मुसलमानांसाठी स्वतंत्र राष्ट्र म्हणून ‘पाकिस्तान’ म्हणून जन्माला आले. जीनांना हिंदुस्थानात हिंदूंबरोबर रहायचे नव्हते. त्यांनी हट्टाने ८ कोटी मुसलमानांसाठी म्हणून पाकिस्तान मागून घेतला. आपणही ‘हे अंतर्वैर संपावे’, या भावनेने ते तोडून दिले; परंतु त्या फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेलेल्या प्रदेशातील हिंदूंना ज्या क्रूर व भयावह पद्धतीने मारून, रक्तबंबाळ करून, अत्याचार करून ठार मारण्यात वा हाकलून देण्यात आले, तो प्रकार कितीही विसरावे म्हटले, तरी विसरता येणार नाही. ‘डायरेक्ट ॲक्शन’ या नावाने कलंकित असणारी ती चळवळ तेथे असलेल्या हिंदूंच्या हत्येचाच पद्धतशीर कार्यक्रम होता.’
‘हे सर्व होऊनही पाकिस्तानविरहित उर्वरित भारताला या राजकारण्यांनी ‘सेक्युलर’ (निधर्मी) ठरवला. मुसलमानांसाठी पाकिस्तान तोडून दिल्यावर उरलेला भाग हा हिंदुस्थानच असायला हवा होता; पण उदारबुद्धीच्या हिंदूंना सर्वधर्मसमभावाचा (सेक्युलॅरिझमचा) उदारपणा हिंदु धर्माचा घात व्हायला कारणीभूत होईल, हे लक्षात आले नाही. खर्या अर्थाने पाहिले, तर हिंदु धर्म हा परधर्मियांचा द्वेष करणारा नाही. हिंदुत्व हेच तसे ‘सेक्युलर’ आहे.’
– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(साभार : ‘भारतीय संस्कृती’ या ग्रंथातून)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?