फाळणीच्या वेळी आपल्या पूर्वजांकडून चूक झाली नसती, तर सर्व मुसलमान पाकिस्तानात असते ! – Giriraj Singh

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचे विधान

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

पूर्णिया (बिहार) – फाळणीच्या वेळी आमच्या पूर्वजांकडून मोठी चूक झाली आणि त्याची किंमत आज देशाला मोजावी लागत आहे. वर्ष १९४७ च्या फाळणीच्या वेळी जर सर्व मुसलमान पाकिस्तानात गेले असते आणि हिंदूंना भारतात आणले गेले असते, तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती. आज असदुद्दीन ओवैसींसारखे राजकीय नेते अस्तित्वात आले नसते, असे विधान केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी येथे केले.

हे विधान नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या संदर्भातील चर्चेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले होते. या कायद्याच्या समर्थनार्थ बोलतांना मंत्री सिंह यांनी भारतात रहाणार्‍या लोकांच्या नागरिकत्वाच्या प्रश्नावर भाष्य केले आणि फाळणीच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

संपादकीय भूमिका

  • केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी जे सत्य आहे, तेच सांगितले आहे. भारताची फाळणी धर्माच्या आधारे झाली होती आणि मुसलमानांना पाकिस्तान देण्यात आले होते. जे पाकिस्तानात गेले नाही आणि भारतात राहिले त्यांच्यामुळेच देशात मोठी समस्या निर्माण झालेली आहे !
  • भारतातील मुसलमान पाकिस्तानात गेले असते, तर प्लेसस ऑफ वर्शिप कायदा, वक्फ बोर्ड कायदा हे झाले नसते. लव्ह जिहाद, लँड जिहाद, थूंक जिहाद यांसारखे जिहाद झाले नसते. हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे झाली नसती, देशात दंगली झाल्या नसत्या, हिंदूंच्या करांचा पैसे मुसलमानांवर उधळला गेला नसता. दिवसांतून ५ वेळा मशिदींवरील अजान ऐकू लागली नसती, लोकसंख्येचा भार वाढला नसता अशा अनेक समस्या निर्माण झाल्या नसत्या !