फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी व्यक्त केली आशा

हेलसिंकी (फिनलँड) – पश्चिम आशियातील चालू असलेले युद्ध थांबवण्यासाठी जगाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याची अपेक्षा फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी व्यक्त केली. या वेळी ते म्हणाले की, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम घडवून आणण्यासाठी युरोप अन् विशेषतः भारताने अधिक सक्रीय भूमिका घ्यावी. अलीकडील काळात परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी इराणी नेत्यांशी चर्चा केली असल्याचे नमूद करत, ‘भारताने खरोखर पुढाकार घेतल्यास ते अत्यंत उपयुक्त ठरेल. भारतावर दोन्ही बाजूंचा विश्वास असल्यामुळे हे शक्य आहे, असे मला वाटते’, असेही ते म्हणाले.
स्टब यांनी याच महिन्यात ४ ते ७ मार्च या कालावधीत भारताचा दौरा केला होता. अलीकडे परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी परिस्थिती शांत करण्यासाठी युद्धबंदीचे आवाहन केले.
Trump On Iran war : शांतता करार लवकरच होणार : इराण युद्ध संपले ! – ट्रम्प यांचा दावा
मुंबई विमानतळावर गांजाची तस्करी करणार्या मॉडेलला अटक
US President Donald Trump : (म्हणे) ‘अमेरिकेने इराणच्या आक्रमणांपासून भारतीय नौकांचे रक्षण केले !’ : डॉनल्ड ट्रम्प
Mother Alleges ChatGPT : ‘चॅटजीपीटी’मुळे मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप !
कट्टरतावाद्यांच्या दबावापुढे झुकत ‘सनातन धर्म संकुला’चे बांधकाम थांबले !
Elon Musk : इलॉन मस्क बनले जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’ !