
‘श्रीराम-रावण लंकेच्या युद्धाच्या वेळी मेघनाद आणि लक्ष्मण यांचे युद्ध झाले. त्या युद्धात मेघनादाने चालवलेली शक्ती लक्ष्मणाला लागली आणि लक्ष्मण बेशुद्ध झाला. लक्ष्मणावर उपचार करण्यासाठी श्रीरामाने हनुमानाला सुषेण वैद्याकडे पाठवले. सुषेण हा लंकेतील रावणाच्या राज्यातील वैद्य होता. त्यामुळे त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला, ‘शत्रूपक्षातील योद्धा जखमी झाल्यावर मी त्याच्यावर उपचार करू शकतो का ? हा देशद्रोह ठरेल का ? यासाठी रावण मला मृत्यूदंडही देऊ शकतो.’ अशा प्रसंगी महापुरुष उत्तर शोधण्यासाठी ध्यान करत असत. सुषेणने ध्यान केले आणि त्याला उमगले, ‘रुग्ण कुणीही असो, ‘त्याच्यावर उपचार करणे’, हा माझा धर्म आहे.’ त्याप्रमाणे सुषेणने लक्ष्मणावर उपचार केले. पुढे ‘इंडियन रेड क्रॉस’ची हीच नीती ठरली.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०२२)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !