Nepal Hindus Under Attack : ५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केल्यास हिंदूंना फाडून टाकू ! – मुसलमानांची धमकी

  • नेपाळमध्ये मशिदीसमोरून हिंदूंनी सवाद्य वरात काढल्याने मुसलमानांकडून हिंसाचार

  • २ पोलिसांसह ८ जण घायाळ

  • १८ मुसलमानांना अटक

काठमांडू (नेपाळ) – नेपाळच्या मधेश प्रांतातील भारताच्या सीमेजवळील रौतहट जिल्ह्यात गौर नगरपालिका परिसरात मशिदीसमोरून हिंदूंनी सवाद्य वरात काढल्यामुळे मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. या वेळी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. यात २ पोलिसांसह ८ जण घायाळ झाले. हिंसाचाराच्या प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये मुसलमान ‘५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केल्यास हिंदूंना फाडून टाकू’, अशी धमकी देत असल्याचे दिसत आहे. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे. तरीही गौरच्या आतील भागांत तणाव कायम असून जाळपोळीच्या घटना पूर्णपणे थांबलेल्या नाहीत.

हिंसाचाराची पार्श्‍वभूमी

गौर नगरपालिका-६ मधील सनगडा गावात १९ फेब्रुवारीच्या संध्याकाळी मशिदीत रमझानच्या काळातील नमाजपठण चालू होते. त्याचवेळी मशिदीसमोरून वाद्यांसह वरात जात होती. वाद्य वाजवल्यावरून मुसलमानांनी आक्षेप घेत वरात रोखली. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली. या वेळी एका वाहनाला आग लावण्यात आली. परिस्थिती बिघडू नये; म्हणून प्रशासनाने शेकडो पोलीस तैनात केले.

समेटानंतरही पुन्हा दगडफेक

२० फेब्रुवारीला येथे दिवसभर तणाव कायम राहिला; मात्र संध्याकाळी दोन्ही बाजूंमध्ये ६ सूत्रांवर समेट झाला. तरी २१ फेब्रुवारीच्या सकाळी ९ वाजता मुसलमानांकडून पुन्हा दगडफेक चालू झाली. याचा परिणाम गौरच्या प्रभाग क्रमांक ४, ५ आणि ६ मध्येही दिसून आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. अखेर प्रशासनाला संचारबंदी लागू करावी लागली.

सैन्य तैनात, तरी तणाव कायम

मुसलमानांनी अनेक वाहनांना आग लावली आणि घरांची तोडफोड केली. पोलिसांच्या माहितीनुसार ६ मोटारसायकली आणि २ जीप जाळण्यात आल्या. गौर नगरपालिका-४ मधील मचकुटिया टोल येथे एका दुचाकीलाही आग लावण्यात आली. संचारबंदी लागू केल्यानंतर नेपाळ पोलीस आणि नेपाळी सैन्य तैनात करण्यात आले आहे. मुख्य रस्ता परिसर तुलनेने शांत असला, तरी आतील भागांत अद्याप तणावपूर्ण स्थिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत १८ मुसलमानांना अटक केली आहे.

प्रमुख जिल्हाधिकारी दिनेश सागर भूसाल यांनी सांगितले की, पूर्वेला मुडबलवा गेट, पश्‍चिमेला लालबकैया बंधारा, उत्तरेला बम कालवा आणि दक्षिणेला गौर भन्सार कार्यालयापर्यंत संचारबंदी प्रभावी आहे.

संपादकीय भूमिका

  • नेपाळमध्ये हिंदूंची लोकसंख्या ८१ टक्के, तर मुसलमानांची ५ टक्के असतांना ते हिंदूंना फाडण्याची धमकी देतात, हे हिंदूंना लज्जास्पद !

  • जे भारतात होते, तेच नेपाळमध्ये होत आहे. त्यामुळे जगभरातील हिंदू शेळपट आहेत, हे परत परत सिद्ध होत आहे. या मानसिकतेतून हिंदू बाहेर पडले नाही, तर पुढील काही वर्षांत त्यांचे अस्तित्व नष्ट होईल. याविषयी आश्‍चर्य वाटू नये !
  • भारतात नमाजपठणाच्या वेळी मशिदीसमोरून वाद्य वाजवल्यावर मुसलमान आक्रमणे करत असल्याच्या घटना नेहमीच घडत असतात, त्यामुळे भारतात अशा वेळी पोलिसांनी सतर्क होऊन कृती करणे आवश्यक आहे !