
उकाडा चालू झाल्याने सगळ्यांनी आईस्क्रीम, मिल्कशेक, कोल्ड कॉफी वगैरे पदार्थ खायला प्रारंभ केला आहे. आताच्या थंडीनंतर वाढीला लागलेला उन्हाळा हा थंडीत साठलेला कफ बाहेर टाकण्याचे काम करणारा आहे. यामुळे कफाचे त्रास आता पटकन होणार. थंडी ते आता चालू झालेला उकाडा या ऋतूसंधीमध्ये घसा आणि नाक यांना मुख्यतः त्रासापासून जपणे आवश्यक. त्यामुळे अचानक फळे, फळांचे रस, लस्सी, गार ताक आणि वर सांगितलेले पदार्थ चालू करतांना जरा जपूनच करावेत.

यासह ऋतूंमधील पालटांमुळे अंगावर पुरळ, खाज, गांध्या आणि कोरडेपणा यांचेही प्रमाण वाढले आहे. त्यासाठी पोट स्वच्छ ठेवणे, हलके, कोरडे आणि अल्प मसालेदार खाणे, शिळे अन् आंबवलेले टाळणे, नियमित व्यायाम या गोष्टी साहाय्य करतात. पुष्कळ गरम पाण्याने मीठ घालून गुळण्या करण्यापेक्षा कोमट पाणी आणि हळद यांच्या गुळण्या कराव्यात.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (८.२.२०२६)
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
क्रिकेटचा उदो उदो नको !