
उकाडा चालू झाल्याने सगळ्यांनी आईस्क्रीम, मिल्कशेक, कोल्ड कॉफी वगैरे पदार्थ खायला प्रारंभ केला आहे. आताच्या थंडीनंतर वाढीला लागलेला उन्हाळा हा थंडीत साठलेला कफ बाहेर टाकण्याचे काम करणारा आहे. यामुळे कफाचे त्रास आता पटकन होणार. थंडी ते आता चालू झालेला उकाडा या ऋतूसंधीमध्ये घसा आणि नाक यांना मुख्यतः त्रासापासून जपणे आवश्यक. त्यामुळे अचानक फळे, फळांचे रस, लस्सी, गार ताक आणि वर सांगितलेले पदार्थ चालू करतांना जरा जपूनच करावेत.

यासह ऋतूंमधील पालटांमुळे अंगावर पुरळ, खाज, गांध्या आणि कोरडेपणा यांचेही प्रमाण वाढले आहे. त्यासाठी पोट स्वच्छ ठेवणे, हलके, कोरडे आणि अल्प मसालेदार खाणे, शिळे अन् आंबवलेले टाळणे, नियमित व्यायाम या गोष्टी साहाय्य करतात. पुष्कळ गरम पाण्याने मीठ घालून गुळण्या करण्यापेक्षा कोमट पाणी आणि हळद यांच्या गुळण्या कराव्यात.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (८.२.२०२६)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !