अर्थसंकल्प म्हणजे ‘लोककल्याणकारी’ विकसित भारताच्या दिशेने भक्कम पाऊल ! – आमदार सुधीर गाडगीळ

सांगली, १ फेब्रुवारी (वार्ता.) –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रशासनाने सादर केलेला वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक, दूरदृष्टी असलेला आणि भारताला जागतिक आर्थिक महासत्ता बनवणारा आहे, असे मत येथील भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी १ फेब्रुवारी या दिवशी व्यक्त केले.

प्राप्तीकर सवलतींमुळे मध्यमवर्गाला दिलासा, शेती आणि ग्रामीण विकासाला चालना, पायाभूत सुविधांसाठी विक्रमी प्रावधान, युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि महिला सक्षमीकरणावर भर असल्याचे त्यांनी नमूद केले. हा अर्थसंकल्प गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण यांच्या आशा-आकांक्षांना बळ देणारा असून ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राला सार्थ ठरवणारा आहे. सांगली आणि महाराष्ट्राच्या विकासासाठीही तो पूरक ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.