हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
बलसा खुर्द (जिल्हा परभणी) येथे २६ एप्रिलला मतदानाच्या वेळी १ सहस २९५ ग्रामस्थांनी गावात कामे करण्यात आली नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकला होता; मात्र जिल्हाधिकार्यांनी आश्वासन दिल्यावर मतदान केले.
बलसा खुर्द (जिल्हा परभणी) येथे २६ एप्रिलला मतदानाच्या वेळी १ सहस २९५ ग्रामस्थांनी गावात कामे करण्यात आली नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकला होता; मात्र जिल्हाधिकार्यांनी आश्वासन दिल्यावर मतदान केले.
कर्नाटकच्या गंगावती तालुक्यातील श्रीरामनगर येथील ‘शाईन बार’मध्ये ‘जय श्रीराम’ असे म्हणणार्या कुमार राठोड याच्यावर २० मुसलमान तरुणांनी आक्रमण केले. यात घायाळ झालेल्या राठोड याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने राज्यातील सर्व मुसलमानांना मागासवर्गीय ठरवले असून त्यांना सरकारच्या नियंत्रणाखालील शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकर्या या ठिकाणी आरक्षण देण्यात येणार आहे.
वर्ष १९६२ ते २०२० या ६१ वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील बर्याच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांमध्ये एकूण ९ सहस्र ६१० कोटी ३२ लाख रुपयांचा अपहार झाला आहे.
मुंबईसह उपनगरांतील ६५ टक्के बार-मद्यालयांना देवता, संत आणि ऐतिहासिक गड-दुर्ग यांची नावे आहेत. अशा नावांमध्ये पालट करणे शक्य नसल्याचा कांगावा करत उत्पादन शुल्क विभागाने याविषयीचा शासन आदेश रहित करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सरकार भारतीय पुरोहितांना व्हिसा देत नाही. त्यामुळे ब्रिटनमधील अनुमाने ५०० मंदिरांपैकी ५० मंदिरे बंद करण्यात आली आहेत. उर्वरित अनेक मंदिरांमधील कामे ठप्प झाली आहेत.
संयुक्त अरब अमिरात या वाळवंट असणार्या इस्लामी देशातील दुबईसह काही शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. देशात हिंदु मंदिर बांधल्यामुळे तेथे ही स्थिती निर्माण झाल्याचा प्रसार धर्मांधांकडून सामाजिक माध्यमांतून केला जात आहेत.
हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील बीव्हीबी महाविद्यालयाच्या परिसरात प्रेमप्रकरणातून काँग्रेसच्या नगरसेवकाची मुलगी नेहा हिरेमठ हिची फैयाज याने चाकूने भोसकून हत्या केली.
रामनवमीच्या दिवशी बंगालमध्ये ३ ठिकाणी हिंसाचार झाला. मुर्शिदाबाद येथे छतांवरून मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. गावठी बाँब फोडण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. तिन्ही ठिकाणी झालेल्या हिंसाचारात १८ जण घायाळ झाले आहेत.
म्यानमारच्या अराकान प्रांतातील बुथिदुआंग येथे १ सहस्र ६०० हून अधिक हिंदू आणि १२० बौद्ध धर्मियांना रोहिंग्या मुसलमानांच्या सशस्त्र संघटनेने ओलीस ठेवल्याचे वृत्त ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने प्रसारित केले आहे.