एकमेवाद्वितीय ‘सनातन प्रभात’ नियतकालिके !

एकमेवाद्वितीय ‘सनातन प्रभात’ नियतकालिके !

‘छोट्याशा ‘सनातन प्रभात’ने सहस्रो राष्ट्र आणि धर्म प्रेमी सिद्ध केले. याउलट लाखो वाचक असलेल्या नियतकालिकांनी आणि दूरचित्रवाहिन्यांनी हातांच्या बोटांवर मोजता येईल, इतके तरी राष्ट्र आणि धर्म प्रेमी सिद्ध केले का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मानवाची पराकोटीची अधोगती !

‘विज्ञानाने विविध यंत्रे शोधून मानवाचा वेळ वाचेल असे केले; पण ‘त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा’, हे न शिकवल्याने मानव पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

म्हातारपण, म्हणजे दुसरे बालपण – ‘आई गं’ !

‘म्हातारपणी शरीर जर्जर होऊन कोणतीही हालचाल करतांना वेदना अनुभवयास येतात. त्या वेदनांमुळे आपोआपच तोंडातून ‘आई गं’ हा शब्द बाहेर पडतो !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘स्वतःला सर्व कळते’, हा अहंभाव असतो; म्हणून त्यांना एकाही विषयाचे पूर्ण ज्ञान नसते, तर संतांना अहंभाव नसतो, त्यामुळे त्यांना शब्दातीत अनेक विषयांचे ज्ञान असते !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सर्वधर्मसमभाव’ मानणार्‍यांचे घोर अज्ञान !

‘सर्वधर्मसमभाव’ मानणार्‍यांचे घोर अज्ञान !

‘निरक्षराने ‘सर्व भाषांतील अक्षरे सारखीच असतात’, असे म्हणणे, जसे म्हणणार्‍याचे अज्ञान दाखवते, त्याचप्रमाणे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे त्यांचे अज्ञान दाखवतात. ‘सर्व औषधे, सर्व कायदे सारखेच आहेत’, असे म्हणण्यासारखे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणे आहे.’

म्हातारपणाचा लाभ मृत्यूही हवासा वाटणे 

म्हातारपणाचा लाभ मृत्यूही हवासा वाटणे 

‘म्हातारपणात शरीर कोणत्याही स्तरावर साथ देत नसले की, अंथरुणावर खिळून रहावे लागते. अशा स्थितीत ना पैसा कमावण्याची इच्छा होते ना आयुष्यभर स्वकष्टाने कमावलेला पैसा ‘खाणे, पिणे आणि फिरणे’ यांसारख्या सुखांसाठी खर्च करण्याची इच्छा होते.

सध्याचा प्रतिकूल काळ म्हणजे आत्मचिंतन करण्याचा काळ आहे !

सध्याचा प्रतिकूल काळ म्हणजे आत्मचिंतन करण्याचा काळ आहे !

‘अनुकूल काळात नव्हे, तर प्रतिकूल काळातच साधकाच्या साधनेची खरी परीक्षा होते. आपत्कालीन स्थितीत आत्मपरीक्षण करण्याची नामी संधी असते. ‘अशा काळात आपली मनःस्थिती कशी आहे ? प्रतिकूलतेला सामोरे जाण्याची मनाची कितपत सिद्धता आहे ?’, याचे चिंतन करता येते.

कुठे शास्त्रज्ञ, तर कुठे ऋषि-मुनी !

‘कुठे परग्रहावर जाणारे यान शोधले की, विज्ञानाचे कौतुक करणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे सूक्ष्मदेहाने विश्‍वातच नाही, तर सप्तलोक आणि सप्तपाताळ यांतही क्षणार्धात सूक्ष्मातून जाऊ शकणारे ऋषि-मुनी !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले        

देवाच्या कृपेचे महत्त्व !

‘देवाची कृपा अनुभवल्यावर समाजातून कुणी कौतुक केले, तरी त्याची किंमत शून्य वाटते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

सुखासाठी कर्तव्याकडे दुर्लक्ष करणारी सध्याची पिढी !

​‘सांसारिक जीवनात सर्वांत अधिक सुख नवरा-बायको हेच एकमेकांना देतात. त्यामुळे मोठेपेणी ते स्वतःच्या आई-वडिलांना सांभाळण्याचे कर्तव्य सोडून स्वतंत्र रहातात आणि त्यांच्याकडे जातही नाहीत !’