भारताच्या राजधानीत हिंदू असुरक्षित !
देहलीतील शाहरूख या तरुणाने वादातून शिवम आणि कमल किशोर या दोघा भावांवर चाकूने केलेल्या आक्रमणात कमल किशोर याचा मृत्यू झाला, तर शिवम गंभीररित्या घायाळ झाला. पोलिसांनी शाहरूख याला अटक केली आहे.
देहलीतील शाहरूख या तरुणाने वादातून शिवम आणि कमल किशोर या दोघा भावांवर चाकूने केलेल्या आक्रमणात कमल किशोर याचा मृत्यू झाला, तर शिवम गंभीररित्या घायाळ झाला. पोलिसांनी शाहरूख याला अटक केली आहे.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ‘आज तक’ वृत्तवाहिनीचे पत्रकार सुधीर चौधरी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. चौधरी यांनी त्यांच्या कार्यक्रमातून कर्नाटकातील स्वावलंबी सारथी योजनेत हिंदूंवर होत असलेल्या अन्यायावर आवाज उठवला होता.
देशातील विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची निर्मिती सनातन धर्माला नष्ट करण्याच्या एकमेव उद्देशाने करण्यात आली आहे, असे विधान तमिळनाडूतील द्रमुक सरकारमधील शिक्षणमंत्री के. पोनमुडी यांनी केले.
केरळमधील पाद्री रेव मनोज केजी यांनी प्रसिद्ध शबरीमला मंदिरात भगवान अय्यप्पांचे ४१ दिवसांचे व्रत पाळल्यावरून चर्चने त्यांना विरोध केला. यानंतर पाद्री केज यांनी चर्चचे ओळखपत्र आणि परवाना परत केला.
फरीदाबाद (हरियाणा) येथे बजरंग दलाच्या २ कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक आक्रमणात आलोक नावाचा कार्यकर्ता ठार झाला, तर शिवम हा कार्यकर्ता गंभीररित्या घायाळ झाला. पोलीस यामीन, राजा आणि गुगा यांचा शोध घेत आहेत.
पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानचे नागरिक अनेक दिवसांपासून रस्त्यावर उतरून पाकिस्तान सरकारचा निषेध करत आहेत. त्यांना भारतात समाविष्ट व्हायचे आहे. त्यांनी स्वतःच्या घरांवर भारताचा तिरंगा ध्वज फडकावला आहे.
‘उदयनिधी यांना सनातन धर्मावर त्यांची मते मांडण्याचा अधिकार आहे. जर तुम्ही त्यांच्या दृष्टीकोनांशी असहमत असाल, तर सनातन धर्माची वैशिष्ट्ये सांगणारी चर्चा घडवून आणा’, अशी प्रतिक्रिया अभिनेते कमल हासन यांनी व्यक्त केली.
अयोध्येत सध्या ३२ सहस्र कोटी रुपयांचे प्रकल्प उभारून अयोध्येला जगातील सर्वांत मोठे धार्मिक पर्यटन केंद्र बनवण्याचे सरकारचे ध्येय आहे.
‘जगात अनेक धर्म जन्माला आले आहेत; परंतु हिंदु धर्म केव्हा आणि कसा जन्माला आला ?, याविषयी मात्र अजूनही प्रश्नचिन्हच आहे’, असे विधान कर्नाटकचे काँग्रेस सरकारमधील मंत्री जी. परमेश्वर यांनी केले.
‘भारताच्या राज्यघटनेत पालट करून ‘इंडिया’ हे नाव हटवून केवळ ‘भारत’ हेच नाव ठेवावे’, अशी मागणी भाजपचे खासदार हरनाथ सिंह यादव यांनी वृत्तसंस्थेशी बोलतांना केली.