रावणवधानंतर प्रभु श्रीरामचंद्रांना अयोध्येत पोचण्यास २१ दिवस कसे लागले ?

हिंदूंनी संकेतस्थळांवरील अशा बिनबुडाच्या चर्चांमध्ये सहभागी होऊन तर्क-वितर्क लावत न बसता धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यात वेळ घालवला, तर तो सत्कारणी लागेल !

भावपूर्ण दिवाळी कशी साजरी करावी ?

दिवाळी म्हणजे उत्साह. दिवाळी म्हणजे आनंद, असा विचार केल्यास साधकांच्या जीवनात केवळ गुरुमाऊलीच्या कृपेमुळे इतका आनंद असतो की, आपण प्रत्येक क्षणी दिवाळी अनुभवतो. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्य श्रीगुरुचरणांशी जोडून आनंद घेऊया.

आकाशदीप

आकाशकंदिलाचा मूळ शब्द ‘आकाशदीप’ असा आहे. हल्ली तुपाच्या दिव्याच्या जागी विजेचा दिवा आल्याने त्याला आकाशकंदिल म्हटले जाते. घराच्या द्वारात टांगलेल्या आकाशदीपामुळे घराभोवती असलेल्या वायुमंडलाची शुद्धी होते. याचेच प्रत्यक्ष वास्तूत टांगण्याचे दुसरे रूप म्हणजे लामणदिवा !

भाऊबीज (यमद्वितीया)

या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची शास्त्रीय माहिती या लेखाच्या माध्यमातून करून घेऊया.

बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा)

बलीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. त्रिपाद भूमी दान मागून वामनाने बलीराजाला जरी पाताळात धाडले असले, तरी सर्वार्थाने त्याचे कल्याणच केले आहे. पृथ्वीतलावर दीपावली साजरी केली जाण्यामागेदेखील या घटनेचा प्रमुख आधार आहे.

लक्ष्मीपूजन

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे.

नरक चतुर्दशी

दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते. या सणाचे महत्त्व आणि करण्यात येणार्‍या कृतींमागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.

धनत्रयोदशी (धनतेरस)

दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने . . . धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. या दिनाचे महात्म्य, या दिवशी करायच्या कृतीमागील शास्त्र या लेखातून जाणून घेऊया.

कोजागरी पौर्णिमेचे व्रत

‘आश्विन मासातील पौर्णिमेला भगवती महालक्ष्मी ‘रात्री कोण जागे आहे ?’, हे पहाण्यासाठी भ्रमण करत असते. ‘जे जागरण करतात, त्यांना लक्ष्मी धन देते, असे म्हटले जाते. लक्ष्मीदेवी ‘को जागर्ति’ (कोण जागे आहे ?) असे म्हणत असल्याने या व्रताला ‘कोजागर’ असे म्हणतात.

हिंदूंनो, शक्तीदायिनी विजयादशमी कशी साजरी कराल ?

शमी पाप शमवते (नष्ट करते). शमीचे काटे तांबूस असतात. शमी रामाला प्रिय बोलणारी असून अर्जुनाच्या बाणांचे धारण करणारी आहे. हे शमी, रामाने तुझी पूजा केली आहे. मी यथाकाल विजययात्रेला निघणार आहे. ही यात्रा तू मला निर्विघ्न आणि सुखकारक कर.