द्राक्ष बागायतदार संकटात

कोरोनामुळे देश बंद झाल्याचा फटका जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांनाही बसत आहे. द्राक्ष वाहतुकीला राज्यबंदी झाल्यामुळे द्राक्षे बागेतच पडून राहून खराब होत आहेत.

दिंडोरी (नाशिक) येथे लाखो रुपयांचा अवैध ‘सॅनिटायझर’चा साठा जप्त

तालुक्यातील जवळके दिंडोरी शिवारातील एका ‘वेअर हाऊस’मधील आस्थापनात अवैध आणि अप्रमाणित ‘सॅनिटायझर’चा अनुमाने ८ लाख रुपयांचा साठा दिंडोरी पोलिसांनी जप्त केला असून अमित अलिम चंदानी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

देशभरात कोरोनाचे ५८८ रुग्ण, एकूण ११ जणांचा मृत्यू

देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५६२ झाली असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे तमिळनाडू आणि देहली येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. याचसमवेत देशाच्या वेगवेगळया भागातील कोरोनाची बाधा झालेले ४८ रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले असून…

कोरोनामुळे जगभरात १९ सहस ६०७ जणांचा मृत्यू

कोरोनामुळे जगभरात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता १९ सहस्र ६०७ झाली आहे. एकूण १७५ देशांत ४ लाख ३४ सहस्र ९८३ रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या अजून जास्त असण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. असे असले, तरी कोरोनाची लागण झालेले १ लाख ११ सहस्र ८७०…

देशात २१ दिवस संपूर्ण ‘दळणवळण बंदी’ लागू ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे तो रोखण्यासाठी २४ मार्चला रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण देशात २१ दिवसांची (१४ एप्रिलपर्यंत) ‘दळणवळण बंदी’ (लॉकडाऊन) करण्यात येत आहे.

वर्तमानपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही ! – जागतिक आरोग्य संघटना

वृत्तपत्रांमुळे कोरोना पसरण्याचा धोका अत्यंत अल्प आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. ‘एक अशी वस्तू जी अनेक ठिकाणी प्रवास करून आपल्यापर्यंत पोचते. म्हणजेच एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जातांना ती वस्तू वेगवेगळ्या तापमानामधून, परिस्थितीतून प्रवास करते.

‘जनता कर्फ्यू’च्या दिवशी २ सहस्र लोकांना मेजवानी देणार्‍या इरफान सिद्दकी या काँग्रेस नेत्यावर गुन्हा नोंद

येथील अंबिकापूरमध्ये २२ मार्च या दिवशीच्या ‘जनता कर्फ्यू’च्या वेळी २ सहस्र लोकांना पंचतारांकित ‘ग्रँड बसंत’ या हॉटेलमध्ये मेजवानी दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे नेते इरफान सिद्दकी आणि हॉटेलचे संचालक के.के. अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने बेघरांना भाजी-पोळी आणि पाणी यांचे वाटप

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील बेघर आणि भिक्षेकरी यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाजी-पोळीचे पाकीट अन् पाणी यांचे वाटप केले.

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी उद्योगपतींकडून आर्थिक साहाय्याची घोषणा

भारतीय उद्योग श्रेत्रातील मोठी आस्थापने आणि व्यक्ती यांना कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्यास प्रारंभ केले आहे.

चीनकडून हिंद महासागरामध्ये १२ अंडरवॉटर ड्रोन्स तैनात

चीनकडून हिंद महासागरामध्ये १२ अंडरवॉटर ड्रोन्स तैनात करण्यात आले आहेत. चीनमध्ये कोरोनाचे संकट असतांनाही तो भारताच्या नौदलाची माहिती काढण्यासाठी प्रयत्नरत आहे, हे यातून लक्षात येते !