मुंबई महापालिका सभागृहात जागेअभावी अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यास प्रशासनाचा नकार
भारतरत्न आणि देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिला आहे.
भारतरत्न आणि देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिला आहे.
दळणवळण बंदी काळापासून अद्यापर्यंत वीज कर्मचारी प्राणांची पर्वा न करता काम करत आहेत. शासनाने इतर विभागातील कर्मचार्यांना दीपावलीनिमित्त सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर केले; मात्र वीज कर्मचार्यांना यापासून वंचित ठेवले.
कोरोनामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चोर्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
कराड तालुक्यातील कोळेवाडी येथे ९४ सहस्र ५०० रुपयांच्या बनावट नोटा आणि देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. ठाणे गुन्हे शाखा आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखा यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली.
गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात ९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र ७० झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ७९३ आहे.
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र, विभाग सिंधुदुर्गच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतीकृतींचे प्रदर्शन मळगाव येथे भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन १९ नोव्हेंबरपर्यंत चालू रहाणार आहे.
एका अल्पवयीन मुलीवर खासगी लॉजमध्ये बलपूर्वक अत्याचार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या ३ युवकांना जिल्हा विशेष न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली. त्यानंतर या तिघांची सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.
शहरातील पिळणकरवाडी येथील ऋषभ (ऋत्विक) विजय पिळणकर (वय २२ वर्षे) याचे १५ नोव्हेंबरला तापसरीने निधन झाले. ताप येत असल्याने त्याला शनिवार, १४ नोव्हेंबरला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते
मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्वर यांच्या वार्षिक पालखी सोहळ्याला सोमवार, १६ नोव्हेंबर २०२० या दिवशी दुपारी १२ वाजता देऊळवाडा येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथून प्रारंभ होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा गावात आगळीवेगळी परंपरा असलेले एक श्री गणेश मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील मंदिरात प्रतीवर्षी दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मातीपासून सिद्ध केलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून पूजा केली जाते.