‘उच्च कोटीच्या संतांचे ‘सगुण-निर्गुण नाही भेदाभेद’ या तत्त्वाच्या आधारावर कार्य चालू असल्याने त्यांची स्वेच्छाही ईश्वरेच्छाच असते !’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

‘देवतांनी प.पू. दादाजींना (प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांना) आधीच सांगून ठेवले होते की, ‘आपल्याला आपल्या इच्छेनुसार मरण येईल. तेव्हा आम्ही आपल्याला वैकुंठलोकात नेण्यास येऊ.’

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

मी परम पूज्यांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) विचारले, ‘‘याला स्वेच्छामरण म्हणायचे का ?’’ त्या वेळी परम पूज्य म्हणाले, ‘‘प.पू. दादाजी हे उच्च कोटीचे संत होते. उच्च कोटीच्या संतांना स्वत:ची अशी काही इच्छा नसते. त्यांचा मृत्यूही ईश्वरेच्छेनेच होतो. त्यांना त्यांच्या सर्वज्ञतेमुळे ईश्वराने त्यांच्या मृत्यूची नेमून दिलेली वेळ कळलेली असल्याने ते स्वत:च्या मृत्यूविषयी आधीच भाष्य करून ठेवतात. त्या वेळी आपल्याला वाटते की, अरे, हे स्वेच्छामरण आहे; परंतु तसे ते नसते.

‘उच्च कोटीच्या संतांनी सांगून देहत्याग करणे’, ही त्यांची स्वेच्छा नसून ईश्वरेच्छाच असते. उच्च कोटीच्या संतांच्या बाबतीत ‘सगुण-निर्गुण नाही भेदाभेद’ या तत्त्वाच्या आधारावर त्यांचे कार्य चालू असल्याने त्यांची स्वेच्छाही ईश्वरेच्छाच असते.’’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ