घटस्फोटासाठी एक वर्ष वेगळे रहाणे आवश्यक नाही ! – Delhi High Court

नवी देहली – परस्पर संमतीने घटस्फोट घेणार्‍या पती-पत्नी यांसाठी एक वर्ष वेगळे रहाण्याची अट अनिवार्य नाही. हिंदु विवाह अधिनियम, १९५५ अंतर्गत निर्माण केलेली ही अट योग्य प्रकरणांमध्ये माफ केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत पती-पत्नीला विवाहाच्या बंधनातून मुक्त करण्याऐवजी त्यांना चुकीच्या नात्यात अडकवून ठेवणे चुकीचे ठरेल. यामुळे दोघांवर अनावश्यक मानसिक आणि भावनिक ताण येईल, असा निर्णय देहली उच्च न्यायालयाने दिला.